शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

...तुमच्यात हिंमत आहे का?; संजय राऊतांचा नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 10:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय स्वार्थ असतो असा आरोप राऊतांनी केला.

मुंबई – मणिपूरच्या विषयावर युरोपियन संसदेत चर्चा होते, पण भारतीय संसदेत चर्चा होऊ देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. ७० दिवस मणिपूर अजून शांत करता येत नाही. स्वत:ला विश्वगुरू म्हणवता मणिपूर शांत करा. मणिपूर भारताचा भाग आहे. तेथील लोक देशातील जनता आहे. मणिपूरला महिलांना नग्न करून धिंड काढली जाते. ही देशातील १४० कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणताय त्याआधी मणिपूरमध्ये कायदा सुव्यवस्था नीट करा. तेवढी हिंमत तुमच्यात आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय स्वार्थ असतो. मोदी स्वार्थाशिवाय काही करत नाही. भाजपा आणि मोदी यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ ठरवेल. ७० दिवसांनी पंतप्रधान मोदींनी महिलांच्या व्हिडिओवर भाष्य केले. दिल्लीत निर्भया कांड झाल्यानंतर संपूर्ण सरकार हलवून टाकले होते. त्यावेळी भाजपा विरोधात होती. हिंसाचार थांबवता येत नसेल तर ते सरकारचे पूर्णपणे अपयश आहे असा आरोप त्यांनी केला.

दिशाभूल आणि बदनाम करण्याचं काम

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. त्यावर राऊत म्हणाले की, मुंबई कोविड सेंटरने सर्वात उत्तम काम केले. पण विरोधकांच्या पोटात जो गोळा आलेला आहे. त्यामुळे टार्गेट केले जाते. परवा एक महिलेबाबत अश्लिल क्लिप आली ती व्यक्ती फडणवीस, पंतप्रधानांशी जवळीक आहे मग त्यांचा संबंध आहे का? मी इतके भ्रष्टाचाराचे प्रकरणे, पत्रे दिली त्यावर काय कारवाई केली. कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने लोकांचे जीव वाचले. कोर्टासमोर सगळे सत्य येईल. दिशाभूल करण्यासाठी असे आरोप आणि कारवाई केली जाते असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामावर डाग लावायचे. राधाकृष्ण विखे पाटलांना झाकीर नाईकांकडून किती कोटी आले? इक्बाल मिर्चीला सोडले, आता तुमच्यासोबत आले. दादा भुसे १७८ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग ते एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय आहेत. लोकांचे प्राण वाचवले, त्यामुळे उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. २०२४ ला सरकार बदलेल, त्यानंतर ज्यांनी ज्यांनी हे खोटे आरोप केले आहेत. त्रास दिला आहे त्यांना उत्तरे द्यावी लागतील. सरकार बदलणार आहे असा दावाही संजय राऊतांनी केला.

दरम्यानअजित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री होतील, कायदेशीर, घटनात्मक बाबी आम्हालाही कळतात. लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्री होतील हे सत्य शिंदे गटाने स्वीकारले पाहिजे असा टोलाही संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा