शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

मराठा समाजाच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, धनंजय मुंडे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 3:49 AM

मराठा समाजाने इतकी वर्षे संयम दाखवला आहे. लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे.

नागपूर : मराठा समाजाने इतकी वर्षे संयम दाखवला आहे. लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. मराठा समाजातील तरुणांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, त्यांचा अंत बघू नका. या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर त्यांना दोष देऊ नका, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी सरकारला दिला.धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत नियम २८९ अन्वये मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव मांडताना सरकारकडून मराठा समाजाची कशी फसवणूक होत आहे, याची माहिती दिली. मराठा समाजाने राज्यात आतापर्यंत लाखोंच्या संख्येने ५७ मोर्चे काढलेले आहेत. बुधवारी परळी येथे मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. २३ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी आंदोलन होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.राज्यात मोर्चे काढूनही आरक्षण मिळत नसल्याने आता हे मोर्चे तालुका स्तरावर निघत आहेत. मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चे निघत आहेत. समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका , मराठा आरक्षण निर्णय तातडीने घ्या अशी मागणी त्यांनी केली.काँग्रेसचे सुनील दत्त म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाच्या नेत्यांनी सबका साथ, सबका विकास असे आश्वासन दिले होते. पण सरकार थापेबाज आहे. मराठा समाजाचा सरकारने अंत पाहू नये. भाई जगताप यांनीही सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप केला. नरेंद्र पाटील यांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली. विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत, आरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सरकारची भूमिका मांडली. आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने सरकार निर्णय घेऊ शकत नाही. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुठे आरक्षण दिले, असा सवाल केला. यावर विरोधक अधिक आक्रमक झाले. गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकूब केले. कामकाजाला सुरुवात होताच सुनील तटकरे म्हणाले, चार वर्षात सरकारने खोटेपणाचा कळस गाठला आहे. तावडे यांनी सरकारची भूमिका मांडताना केलेले आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डवरून काढण्याची सूचना केली. तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन सभापतींनी दिले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेmarathaमराठाNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८