शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

राम मंदिरावरून राजकारण करू नका!; अयोध्येला निघालेल्या शिवसेनेचे संघाने टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 05:05 IST

राम मंदिराच्या मुद्द्यावर अनावश्यक राजकारण केले जात आहे. मंदिराच्या विषयाला राजकीय व धार्मिक स्वरूप देऊ नये, असा टोला वैद्य यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून लगावला.

मीरा रोड (ठाणे) : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी तेथील जमीन ताब्यात घेऊन मंदिर उभारणी करायची, इतकाच विषय शिल्लक असून केंद्र सरकारने जमीन हस्तांतरित करून आपले वचन पूर्ण केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. मात्र, राम मंदिराच्या मुद्द्यावर अनावश्यक राजकारण केले जात आहे. मंदिराच्या विषयाला राजकीय व धार्मिक स्वरूप देऊ नये, असा टोला वैद्य यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत.भार्इंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत बुधवारपासून संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची तीन दिवसांची बैठक सुरू झाली. शुक्रवार, २ नोव्हेंबर रोजी या बैठकीची सांगता सरसंघचालक मोहन भागवत आणि कार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होईल. रायगडावरील नगारखान्याच्या प्रतिकृतीचे प्रवेशद्वार उभारण्यात आले असून सभागृहाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला आहे. बैठक सुरू होण्यापूर्वी सरसंघचालक भागवत यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहिला. बैठकीसाठी देशभरातून ३५० प्रतिनिधी दाखल झाले आहेत. संघाशी संलग्न भाजपासह एकूण १४७ संघटना असून त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा आढावा व त्यावर विचारमंथन बैठकीत केले जाणार आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरही चिंतन होण्याचे संकेत प्राप्त झाले. संघाच्या विस्ताराचा, संघ कुठे कमी आहे, त्या ठिकाणी संघ कसा वाढवायचा, यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!आपत्तीमध्ये स्वयंसेवक मदतीसाठी धावून जातात. पण, त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नसते. त्यांना प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे. देशात संघ स्वयंसेवकांची संख्या वाढत आहे. सुमारे दीड लाख स्वयंसेवकांचे देशभरात कार्य सुरू आहे. बैठकीत प्रत्येक प्रांतनिहाय आढावा घेतला जाईल, असे वैद्य म्हणाले.‘निराधार आरोप करणे ही काँग्रेसची सवय’सरदार वल्लभभाई पटेल हे संघाच्या विरोधात होते, या काँग्रेसच्या आरोपांवर वैद्य म्हणाले की, निराधार आरोप करणे, ही काँग्रेसची सवय आहे. ते कुठलेही आरोप सिद्ध करू शकत नाहीत. संघावर आरोप होत आले आहेत आणि प्रत्येक आरोपास उत्तर देण्याची गरज नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाShiv Senaशिवसेना