शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

अफवांवर विश्वास ठेवू नका, १० जानेवारी रोजी 'महाराष्ट्र बंद' नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 13:48 IST

मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देमराठा समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशा आशयाची एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेकोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे

मुंबई - मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चातर्फे कुठलाही बंद नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मराठा समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशा आशयाची एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनी करण्यात आलं आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहे. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही, आणि कोणीही मराठा सामाजाच्या नावावर मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही असं समन्वयक विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी सांगितलं आहे. 

१ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात एक मराठा भावाला आपला जीव गमवावा लागला. तसेच २ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचं नुकसान केलं गेलं आहे व काही ठिकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत. याच्या निषेधार्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले असून 'महाराष्ट्र बंद'बाबत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि असा कुठलाही बंद ठेवला जाणार नाही असं विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी सांगितलं आहे. 

मराठा समाजातील तरूणांचा वापर करून राजकारण करून मराठा दलित वाद लावू पाहणा-यांच्या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.. मराठा समाजाला उतरवून मराठ्यांनाच टार्गेट करून जातीय तेढ निर्माण करून मराठ्यांची चळवळ मोडीत काढून मराठ्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न हानून पाडावा. मराठा समाजाला आपल्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेच आहे. हिंसाचारापेक्षा आमच्या मुलांना आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेच आहे, तसेच कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आलेले आहे. मराठा क्रांति मोर्चा व सकल मराठा समाजाचे नाव वापरून कोणी बनावट पोस्ट टाकत असेल तर ग्रुपवर मेसेज टाकणा-याला फोन करून जाब विचारावा असे पुढे म्हटले आहे.

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा क्रांती मोर्चाचे नाव घेऊन कोणत्याही पक्ष संघटनेने दिशाभूल करू नये, अन्यथा अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आलेला आहे..

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद