शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पोलिसांची भीती नको, भरोसा हवा - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 7:33 PM

वाढत्या शहरीकरणानंतर एक नवीन समाज व्यवस्था निर्माण झाली आहे़ अशा परिस्थितीत पोलिसांनी देखील त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे

पुणे  - वाढत्या शहरीकरणानंतर एक नवीन समाज व्यवस्था निर्माण झाली आहे़ अशा परिस्थितीत पोलिसांनी देखील त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. पोलिसांची भीती नको तर भरोसा हवा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे पोलीस आयुक्तालयात एकाच छताखाली महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘भरोसा सेवा संकुल’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी ते बोलत होते़ पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, पोलीस दल एक सेवा देणारी यंत्रणा आहे़ त्यामुळे पोलीस ठाण्यात तसेच पोलिसांकडे तक्रार, समस्या घेऊन येणाºया सामान्यांना न्याय देण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे़ त्यासाठी पारंपारिक पद्धतीने पोलीस काम करु शकत नाही़ त्यासाठी समुपदेशन हा चांगला मार्ग आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांनी नागपूर शहरात पोलीस आयुक्त असताना भरोसा सेल या उपक्रमाची सुरवात केली होती़ वेकटेशम हे पोलिसांमध्ये सुधारणावादी अधिकारी असल्याचे सांगितले़

दत्ता पडसलगीकर यांनी पुणे पोलिसांकडून सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. पोलिसांची जी कामे पुण्याच्या हिताच्या दृष्टीने चांगली आहेत, अशा कामासाठी पोलिसांच्या मागे किंवा पुढे नाही तर त्यांच्याबरोबर राहू असा भरोसा देत असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. 

प्रांरभी डॉ़ के़ व्यंकटेशम यांनी पुणे पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेतला़ पुण्यात नागरिक आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवितात़ आम्हाला हे शहर डग्ज फ्री करायचे आहे़ पासपोर्ट व्हेरिफिकेशन आता ५ दिवसात होते़ शहरातील १२५ पोलीस चौक्यांचे सक्षमीकरण करायचे आहे़ पोलिसांचे संख्या बळ वाढविता येत नाही तर त्यांचे कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ डिसेंबरमध्ये प्राणघातक अपघात ३५ टक्क्यांनी घटले.  पोलिसांकडून नागरिकांना सेवा देण्याच्या प्रयत्नात आम्ही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

यावेळी गोळीबार करुन पळून जाणाºया दिल्लीतील गुन्हेगारांना पकडताना गोळीबारात जखमी झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि अ‍ॅप बनविणारी तनया सुनिल फुलारी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी आभार मानले.

शासनाच्या खात्यांचे भारत पाकिस्तानसारखे संबंध

पुण्यात पोलीस, महापालिका, जिल्हाधिकारी यांच्यात समन्वय असल्याचे सांगितले गेले. शासनाचे अनेक विभाग इतके अंतर ठेवून वागतात की ते भारत पाकिस्तान सारखे असल्याचे वाटतात, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिका-यांना लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस