गणोशोत्सव काळात वीजपुरवठा खंडीत

By Admin | Updated: September 1, 2014 23:56 IST2014-09-01T23:56:30+5:302014-09-01T23:56:30+5:30

गणोशोत्सव काळात ग्रामीण भागातील वीजेचे भारनियमन करण्यात येत नाही. परंतु महावितरणने यंदा त्यास हरताळ फासला आहे.

Disruption of electricity supply during Ganeshotsav | गणोशोत्सव काळात वीजपुरवठा खंडीत

गणोशोत्सव काळात वीजपुरवठा खंडीत

वसई : गणोशोत्सव काळात ग्रामीण भागातील वीजेचे भारनियमन करण्यात येत नाही. परंतु महावितरणने यंदा त्यास हरताळ फासला आहे. वसई-विरार मध्ये गेल्या तीन दिवसापासुन सतत वीजपुरवठा खंडीत होत आहे. विरार भागामध्ये सतत वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामध्ये गणोशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत.
 वसई, नालासोपारा, विरार, नवघर-माणिकपुर व ग्रामीण भागात दररोज 8 ते 1क् वेळा वीजपुरवठा खंडीत होत असतो. विरार भागातही वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याच्या प्रकारामुळे गणोशोत्सव मंडळाचे पदाधिकारी हैराण झाले आहेत. अर्नाळा-बोळींज परिसरात वीजपुरवठा सुरळीत होण्याकामी कोणीही कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद झाल्यास कर्मचारीवर्ग कार्यालयात उपलब्ध नसतात व असले तरी ग्राहकांशी त्यांचे उद्दाम वर्तन होत असते. महावितरणच्या खेळखंडोब्यामुळे यंदा गणोशोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे. वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार बंद न झाल्यास जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Disruption of electricity supply during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.