शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; कागदपत्रे सादर करण्याची ठाकरे गटाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 07:59 IST

पुढील आठवड्यात याचिका दाखल करणार

मनोज मोघे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना १९९९च्या घटनेचा आधार घेत उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद अस्तित्वात नसल्याचे निरीक्षण नोंदवले. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. पुढील आठवड्यात याविषयीची याचिका दाखल केली जाणार आहे. २०१९ साली एनडीएचे सरकार स्थापन करताना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याचे पत्र तसेच पक्षप्रमुख म्हणून निवडणूक तसेच अन्य निर्णयांबाबत ठाकरे यांच्या पक्षप्रमुख म्हणून स्वाक्षरीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली जाणार आहेत.

याविषयी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ॲड. अनिल परब हे दिल्लीत दाखल झाले आहेत. परब यांनी दिल्लीत विधिज्ञ ॲड. देवदत्त कामत यांच्यासह अन्य कायदेतज्ज्ञांची भेट घेतली.

तेव्हा ठाकरे यांची भेट का घेतली?: परब

  • उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून अधिकार नाहीत असे नार्वेकर म्हणतात, तर मग भाजपच्या नेत्यांनी २०१९मध्ये ठाकरे यांची भेट घेऊन युतीची घोषणा का केली? २०१९मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांच्या स्वाक्षरीने समर्थनपत्र घेऊन सरकार स्थापन केले. 
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार पक्षाच्या एबी फॉर्मवर लढले आणि निवडणूक आयोगाने परवानगी का दिली, असा सवाल आमदार ॲड. परब यांनी केला. 
  • २०१८च्या घटनेतील बदल, कार्यकारिणीची बैठक आणि ठराव यासंदर्भातील सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली आहेत. त्याची पोचपावतीही निवडणूक आयोगाने दिली आहे, असे असताना अचानक ही घटना अवैध कशी ठरू शकते, असे परब म्हणाले.

आयोगाच्या माहितीच्या आधारे निर्णय: नार्वेकर

२०१८ची घटना व बैठकीतील ठराव निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला, मात्र आयोगाला पक्षाच्या संविधानाची कोणतीही प्रत दिल्याचा उल्लेख ठाकरे गटाकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून माहिती घ्यावी लागली. आयोगाने दिलेल्या माहितीच्या आधारावर निर्णय घ्यावा लागला, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

आम्हीही काेर्टात जाऊ : सामंत

विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निर्णय अतिशय चांगला होता. परंतु, ठाकरे गट त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जात असेल तर आम्हीही ठाकरे गटाच्या १३ आमदारांना अपात्र करावे, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे सूचक विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना केले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Narvekarराहुल नार्वेकर