शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; कागदपत्रे सादर करण्याची ठाकरे गटाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 07:59 IST

पुढील आठवड्यात याचिका दाखल करणार

मनोज मोघे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना १९९९च्या घटनेचा आधार घेत उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद अस्तित्वात नसल्याचे निरीक्षण नोंदवले. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. पुढील आठवड्यात याविषयीची याचिका दाखल केली जाणार आहे. २०१९ साली एनडीएचे सरकार स्थापन करताना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याचे पत्र तसेच पक्षप्रमुख म्हणून निवडणूक तसेच अन्य निर्णयांबाबत ठाकरे यांच्या पक्षप्रमुख म्हणून स्वाक्षरीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली जाणार आहेत.

याविषयी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ॲड. अनिल परब हे दिल्लीत दाखल झाले आहेत. परब यांनी दिल्लीत विधिज्ञ ॲड. देवदत्त कामत यांच्यासह अन्य कायदेतज्ज्ञांची भेट घेतली.

तेव्हा ठाकरे यांची भेट का घेतली?: परब

  • उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून अधिकार नाहीत असे नार्वेकर म्हणतात, तर मग भाजपच्या नेत्यांनी २०१९मध्ये ठाकरे यांची भेट घेऊन युतीची घोषणा का केली? २०१९मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांच्या स्वाक्षरीने समर्थनपत्र घेऊन सरकार स्थापन केले. 
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार पक्षाच्या एबी फॉर्मवर लढले आणि निवडणूक आयोगाने परवानगी का दिली, असा सवाल आमदार ॲड. परब यांनी केला. 
  • २०१८च्या घटनेतील बदल, कार्यकारिणीची बैठक आणि ठराव यासंदर्भातील सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली आहेत. त्याची पोचपावतीही निवडणूक आयोगाने दिली आहे, असे असताना अचानक ही घटना अवैध कशी ठरू शकते, असे परब म्हणाले.

आयोगाच्या माहितीच्या आधारे निर्णय: नार्वेकर

२०१८ची घटना व बैठकीतील ठराव निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला, मात्र आयोगाला पक्षाच्या संविधानाची कोणतीही प्रत दिल्याचा उल्लेख ठाकरे गटाकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून माहिती घ्यावी लागली. आयोगाने दिलेल्या माहितीच्या आधारावर निर्णय घ्यावा लागला, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

आम्हीही काेर्टात जाऊ : सामंत

विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निर्णय अतिशय चांगला होता. परंतु, ठाकरे गट त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जात असेल तर आम्हीही ठाकरे गटाच्या १३ आमदारांना अपात्र करावे, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे सूचक विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना केले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Narvekarराहुल नार्वेकर