शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 06:31 IST

वाद सुरू असतानाच शरद पवारांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी जागा वाटपावर फोनवरून चर्चा केल्याचे समजते. येत्या एक ते दोन दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असताना महाविकास आघाडीतीलकाँग्रेस व उद्धवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचे विधान उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यातही राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याने मविआतील जागा वाटपाची चर्चा गुरुवारी जिथे संपली होती तिथेच थांबली आहे. तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दोन दिवसात जागा वाटप संपू शकते, एवढ्या अंतिम टप्प्यात आले आहे, असेही ते म्हणाले. वाद सुरू असतानाच शरद पवारांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी जागा वाटपावर फोनवरून चर्चा केल्याचे समजते. येत्या एक ते दोन दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

नेमका काय वाद?राऊत म्हणाले, राज्यातील काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत मविआतील जागावाटप थांबले आहे, त्याला गती मिळाली पाहिजे, असे सांगताना याबाबत आपण काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्याशी चर्चा केली असून लवकरच राहुल गांधींनाही भेटणार आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असे मला वाटते. त्यांना वारंवार दिल्लीला यादी पाठवावी लागते. त्यामुळे काही जागांवर फैसला होत नाही. आता वेळ कमी आहे, असे विधान करून संजय राऊत यांनी जागा वाटपाच्या विलंबाला राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दोष दिला आहे.

पटोले म्हणाले, राऊत यांच्याबाबत आम्हाला काही बोलायचे नाही मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जागा वाटपाची समिती स्थापन झाली आहे. या समितीच्या बैठकीत जी चर्चा झाली त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना देणे ही आपली जबाबदारी आहे. संजय राऊत उद्धव ठाकरेंना टाळत असतील तर तो त्यांचा विषय आहे. त्याबाबत आम्हाला माहीत नाही. संजय राऊत यांनी काय करावे तो आमचा प्रश्न नाही. राऊत यांच्याबाबत आम्हाला काही बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

जागांच्या बाबतीत खेचाखेची होतेच... अनेक पक्ष एकत्र निवडणूक लढवतात, तेव्हा जागांची खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे लक्षात ठेवायला हवे. फार मोठा तंटा बखेडा झालेला आहे, असे माझ्या कानावर आलेले नाही. येईल तेव्हा भाष्य करेन. - उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री 

उरलेल्या जागांवर तीनही पक्षांचे पक्षश्रेष्ठी सामंजस्याने निर्णय घेतील. ते त्यांच्या पक्षाची बाजू मांडतात, आमचे नेते आमच्या पक्षाची बाजू मांडतात, दोन्ही बाजू ऐकून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद पक्षांचा वाद नाही हा दोन नेत्यांमधील वाद आहे. दोन नेत्यांमध्ये कधी खटका उडत असतो. - जितेंद्र आव्हाड, नेते, शरद पवार गट 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी