शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Maharashtra Political Crisis: काँग्रेसमधील खदखद वाढली! असंतुष्ट राजीनामे देण्याच्या तयारीत; सोनिया गांधींना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 11:26 IST

Maharashtra Political Crisis: शहरातील काही नेते पक्ष संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्ष अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी टिकणार की फुटणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. यातच आता काँग्रेसमधील काही नेत्यांची खदखद वाढल्याचे सांगितले जात असून, असंतुष्ट नेते थेट राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नव्हे तर, ते अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेणार असल्याचे सांगितले जात आहे. 

प्रदेश प्रतिनिधींच्या निवडीवरून काँग्रेस असंतुष्टांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांना भेटण्याची तयारी त्यांनी केली असून, वेळप्रसंगी पदाधिकारीपदाचा राजीनामा देण्याचा निर्धार केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधींची संकेतस्थळावरील एक यादी व्हायरल झाली. नागपुरातील यादी बाहेर येण्यापूर्वीच नावांवर वाद सुरू झाला. यानंतर असंतुष्टांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर या गटाची दीड तास आमदार निवासात बैठक झाली. 

शहरातील प्रमुख नेत्यांची नावे नाहीत

शहरातील प्रमुख नेत्यांची नावे नसल्याने पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात येणार आहे. कोणत्याही निवडणूक प्रक्रियेविना प्रदेश प्रतिनिधींची निवड लोकशाही विरोधी व निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. एकाच घरातून दोन सदस्य प्रदेशवर पाठवले. निष्ठावान, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षात अलीकडे सक्रिय झालेल्यांना संधी दिल्याचा रोष व्यक्त करण्यात आला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत वेळ घेऊन भेटण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्यास राजीनामा 

पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्यास राजीनामा देण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अर्थात सोनिया गांधी यांच्यासंदर्भात काय घडामोडी होतात, त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आशीर्वादाने शहरातील काही नेते पक्ष संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही करण्यात आला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी