शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

"अरे, सरडा पण लाजला, इतक्या फास्ट त्यांनी रंग बदलला..."; विधान परिषदेत अनिल परब संतापले

By प्रविण मरगळे | Updated: March 20, 2025 15:53 IST

आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात ५ वर्ष चालू आहे. सीबीआय, सीआयडी चौकशी झाली. एसआयटी चौकशी झाली त्याचा रिपोर्ट सभागृहात का मांडला नाही असा सवाल अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

मुंबई - दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विधान परिषदेत मुद्दा उचलताच उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब चांगलेच संतापल्याचं दिसून आले. हे सभागृह कायद्यानुसार चालते, याचे दाखले देशात दिले जातात. परंतु इथं एकतर्फी कारभार चालल्याचं गेल्या काही दिवसात दिसून येते. घटनेनुसार सभापतींना काही अधिकार दिलेत. सभापतींनी न्यायाधीशाची भूमिका बजावायची असते. सभापतींच्या निर्णयाला हायकोर्टात चॅलेंज करता येत नाही. त्यामुळे कुठलेही निर्णय द्यायचे नसतात असं सांगत दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सभागृहात मांडलेल्या पाँईट ऑफ इन्फॉरमेशनवर अनिल परब यांनी भाष्य केले.

आमदार अनिल परब म्हणाले की, काही दिवसांपासून नियमबाह्य निर्णय सभापतींकडून दिले जात आहेत. केवळ तुमच्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज करता येत नाही या छत्रीखाली हवेतसे निर्णय दिले जात आहेत. घटनेची पायमल्ली होतेय. मी वरिष्ठ वकिलांशी बोलून माझे मत मांडतोय. घटनेची मोडतोड कशी होते, त्याबद्दल मी बैठकीत बोलेन. सभागृहाचं कामकाज आपल्याकडे लेखी स्वरुपात येतो. त्यात बदल करण्याचा अधिकार सभापतींना असला तरी सभागृहाला विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला जातो. पाँईट ऑफ इन्फॉरमेशनमध्ये जे जगाला माहिती नाही, बाहेर कुणाला माहिती नाही अशी माहिती सभागृहाला मांडली जाते असं त्यांनी सांगितले.

तसेच आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात ५ वर्ष चालू आहे. सीबीआय, सीआयडी चौकशी झाली. एसआयटी चौकशी झाली त्याचा रिपोर्ट सभागृहात का मांडला नाही. दीड वर्षात हा रिपोर्ट सादर केला नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. शिळ्या कढीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला पडावेत म्हणून हे विषय आणले जातात का?, औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही. आदित्य ठाकरेंची चौकशी करायला काहीच हरकत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं मंत्री सांगतात. १७ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होती परंतु मुख्य न्यायाधीश नव्हते म्हणून तारीख पुढे ढकलली. कोर्ट जो काही निर्णय द्यायचा तो देईल. पाँईट ऑफ इन्फॉरमेशनमध्ये हा विषय मांडला जातो, त्याला परवानगी मिळते असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.

सरड्यालाही लाज वाटली...

दरम्यान, ज्यांनी हा प्रस्ताव आणला त्यांचे एक ट्विट फक्त वाचून दाखवतो. सीबीआयने जेव्हा क्लीनचिट दिली तेव्हा मनीषा कायंदे यांनी ट्विट केले. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाल्याचं सीबीआय रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. परंतु भाजपा आणि राणे गँगने त्याचा थयथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची नाक घासून माफी मागावी असं म्हटलं. या मनीषा कायंदे त्यांनी सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. सरड्यालाही लाज वाटली. आता उपसभापती खुर्ची डोळ्यासमोर दिसते. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप करायचे असं सांगत अनिल परब कायंदे यांच्यावर संतापले. 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Anil Parabअनिल परबAaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाVidhan Parishadविधान परिषद