शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

दिशा सालियान मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप, उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:02 IST

Disha Salian Case: सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान या तरुणीच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत युवासेनाप्रमुख आणि राज्या सरकारमधील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. आता या प्रकरणात उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान या तरुणीच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत युवासेनाप्रमुख आणि राज्या सरकारमधील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या मुद्य्यावरून आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. एकीकडे या प्रकरणाच्या चौकशीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून आग्रही मागणी होत असतानाच दुसरीकडे ठाकरे गटानेही आपल्या युवानेत्यावर होत असलेल्या आरोपांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी समोर येत या आरोपांबाबत कोर्टात उत्तर देऊ अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे वडील आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं घराणं, आमच्या घराण्याचा सहा सात पिढ्या ह्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या विषयात काही तथ्य नाही आहे. दूर दूर तक कोई संबंध नही, म्हणतात त्याप्रमाणे या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबध नाही आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणावरून बेछूट आरोप करत असलेल्या विरोधकांनाही इशारा दिला.  राजकारण जर या वाईट बाजूने न्यायचं असेल, तर मग मात्र सगळ्यांचीच पंचाईत होईल, कारण खोट्याचा जर तुम्ही नायटा करणार असाल, तर ते तुमच्यावरही बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना सांगतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, दिशा सालियान प्रकरणी झालेल्या आरोपांबाबत आपली बाजू मांडताना  आदित्य ठाकरे म्हणाले की, पाच वर्षे सातत्याने बदनामीचा प्रयत्न होत आहे हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे कोर्टातच बोलू. माझ्यावरून सभागृह बंद पाडले जात आहे. पाच वर्षापासून हेच चालू आहे. पण कोर्टात जे होईल ते होईल. पाच वर्षापासून मी यावर मुद्द्याचं बोलत आलेलो आहे आणि बोलत राहणार, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले होते.  

टॅग्स :Disha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना