शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

ऊसतोडणी कामगार संघटना व साखर संघ मधील चर्चा फिस्कटली; आता चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 16:36 IST

ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न गुरूवारी अंधातरीच राहिला.

ठळक मुद्देमुंडे- पवार समर्थक संघटनांमध्ये मतभेद

पुणे: ऊसतोडणीसाठी काही लाखांच्या संख्येने स्थलांतरीत होणार्या ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न गुरूवारी अंधातरीच राहिला. साखर संघ व कामगार संघटना प्रतिनिधींमधील दोन तासांची चर्चा निष्फळ ठरली. संघटनांमधील राजकीय मतभेदांमुुळे एकमत झाले नाही. त्यामुळे आता यावरील अंतिम निर्णय सरकारकडूनच होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणीही कामगार घराबाहेर पडणार नाही व एकही कोयता ऊचलला जाणार नाही असे प्रमूख ८ कामगार संघटनांच्या वतीने गहिनीनाथ थोरे यांंनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते शरद पवार घेतील ती भूमिका मान्य असेल, लवाद वगैरे आम्हाला मान्य नाही असे ते म्हणाले. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मानणार्या महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक मुकादम संघटनेचे पदाधिकारी, माजी आमदार केशव आंधळे यांंनी आम्हाला पंकजा मुंडे- जयंत पाटील यांचा लवाद मान्य असून त्या घेतील तो निर्णय अंमलात आणू असे सांगितले. 

साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांंनी साखर संघ सरकारकडे कामगार संघटनांचे म्हणणे मांडणार आहे असे सांगितले. त्या सर्वांच्याच भावना ऐकल्या आहेत. कामगारांच्या आरोग्य सुरक्षेबाबत सरकारला याआधीच पत्र लिहिले आहे, मजुरीतील दरवाढ व अन्य गोष्टी आता पुढे आल्यात, त्यावर संचालक मंडळात चर्चा होईल व सरकारला त्याप्रमाणे कळवले जाईल असे दांडेगावकर म्हणाले. 

बैठकीसाठी म्हणून ऊसतोडणी कामगार संघटनांचे थोरे, जीवन राठोड, सुशिलाताई मोराळे व अन्य प्रतिनीधींबरोबर सकाळी ११ वाजताच साखर संकुलात ऊपस्थित होते. दांडेगावकर यांंनी त्यांना कोरोना मुळे कोणत्याही बैठका घ्यायला महापालिका आयुक्तांनी मनाई आदेश बजावला असल्याची माहिती दिली व एकत्रित बैठकीला सुरूंग लागला. एकावेळी दोन संघटनांचे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन प्रतिनिधींबरोबर चर्चा करू असे सांगितले. त्यांच्यासमवेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेंद्र नागवडे व अन्य संचालक होते. 

थोरे यांंनी, तसेच अन्य संघटनांच्या प्रतिनीधींनीही अशा चर्चेला नकार दिला. मात्र दांडेगावकर ठाम राहिल्याने अखेर तशीच चर्चा झाली व निष्फळ ठरली. सरकारला सर्व माहिती कळवू, आता सरकारच यावर निर्णय घेईल असे दांडेगावकर म्हणाले.

---///

साखर संघाने सरकारला कोरोना विम्याबाबत पत्र दिले आहे. या विम्याचा हप्ता जास्त आहे, त्यामूळे सरकार,साखर संघ व कामगार अशा तिघांनीही हप्त्याची जबाबदारी घ्यावी अशी सरकारकडे मागणी केली आहे.- जयप्रकाश दांडेगावकर; अध्यक्ष,  साखर संघ.(३१३)

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य