शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

परमबीर सिंह रशियाला पळून गेल्याची चर्चा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 09:04 IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना एनआयएने अनेकदा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

मुंबई:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासाला सामोरे जात आहेत. पण, अनेक वेळा समन्स देऊनही परमबीर सिंह चौकशी आयोगासमोर हजर झाले नाहीत. यामुळे आता ते देश सोडून रशियाला गेल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र सरकार त्यांचा शोध घेत असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते देश सोडू शकत नाही, असेही ते म्हणाले.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्रालयाबरोबरच आम्हीदेखील परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ते देश सोडून गेल्याच्या चर्चा मीही ऐकल्या आहेत, मंत्री असो, सरकारी अधिकारी असो, मुख्यमंत्री असो, भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणीही देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्याविरोधात काय कारवाई करता येईल, त्यावर केंद्राशी चर्चा केली जाईल. महाराष्ट्र सरकार सध्या त्यांचा शोध घेत आहे. यासाठी त्यांच्याविरोधात एक लुकआउट नोटीस जारी केली आहे, असेही पाटील म्हणाले.

काय आहे प्रकरण ?25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका एसयूव्हीमध्ये जिलेटिनच्या काड्या सापडल्या होत्या. ही कार मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीची होती. पण, अचानक त्यांचा मृतदेह एका ठाण्यात सापडला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे हे स्फोटके ताब्यात ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले. वाजे हे परमबीर सिंह यांचे जवळचे मानले जाता. 

मार्चमध्ये एनआयएने वाझे यांना अटक केल्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली होती. एनआयएने त्याच्या आरोपपत्रात परमबीर सिंग यांना आरोपी बनवले नाही, परंतु आरोपपत्रात असे अनेक खुलासे करण्यात आले जे त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलMumbaiमुंबईPoliceपोलिस