शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

परमबीर सिंह रशियाला पळून गेल्याची चर्चा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 09:04 IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना एनआयएने अनेकदा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

मुंबई:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासाला सामोरे जात आहेत. पण, अनेक वेळा समन्स देऊनही परमबीर सिंह चौकशी आयोगासमोर हजर झाले नाहीत. यामुळे आता ते देश सोडून रशियाला गेल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र सरकार त्यांचा शोध घेत असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते देश सोडू शकत नाही, असेही ते म्हणाले.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्रालयाबरोबरच आम्हीदेखील परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ते देश सोडून गेल्याच्या चर्चा मीही ऐकल्या आहेत, मंत्री असो, सरकारी अधिकारी असो, मुख्यमंत्री असो, भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणीही देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्याविरोधात काय कारवाई करता येईल, त्यावर केंद्राशी चर्चा केली जाईल. महाराष्ट्र सरकार सध्या त्यांचा शोध घेत आहे. यासाठी त्यांच्याविरोधात एक लुकआउट नोटीस जारी केली आहे, असेही पाटील म्हणाले.

काय आहे प्रकरण ?25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका एसयूव्हीमध्ये जिलेटिनच्या काड्या सापडल्या होत्या. ही कार मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीची होती. पण, अचानक त्यांचा मृतदेह एका ठाण्यात सापडला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे हे स्फोटके ताब्यात ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले. वाजे हे परमबीर सिंह यांचे जवळचे मानले जाता. 

मार्चमध्ये एनआयएने वाझे यांना अटक केल्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली होती. एनआयएने त्याच्या आरोपपत्रात परमबीर सिंग यांना आरोपी बनवले नाही, परंतु आरोपपत्रात असे अनेक खुलासे करण्यात आले जे त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलMumbaiमुंबईPoliceपोलिस