शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मराठा शिष्टमंडळाने केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2017 3:44 PM

मुंबई, दि. 9 - मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर दाखल झाल्यानंतर मोर्चातील सहा मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ...

मुंबई, दि. 9 - मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर दाखल झाल्यानंतर मोर्चातील सहा मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सोपवले. यावेळी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समाधानकारक चर्चा झाली. दरम्यान मराठा आंदोलनकर्त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.  सरकारच्या निर्णयाविना आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार मराठा मोर्चातील आंदोलकांनी केला होता. मुंबई मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मोर्चाला 25 लाख लोक आले होते, असा दावा केला आहे.

मराठा समाजाने आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी काढलेला हा 58 वा मोर्चा आहे. या मोर्चाला विक्रमी गर्दी झाली आहे. आंदोलक आझाद मैदानात दाखल होत असताना या मोर्चाचे एक टोक चेंबूरपर्यंत होते. दरम्यान, या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनातही उमटले. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ झाला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते. ''मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नाही. आतापर्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन कुणीही राजकारण करू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे, अशी आमची आधीपासूनची मागणी आहे'', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. 

आरक्षण न देण्याचं कोणतंही  कारण नसताना आरक्षण द्यायला दिरंगाई नको. सरकारने लवकरात लवकर ठोस भूमिका घ्यावी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकढा पाठिंबा असताना सरकारचं घोडं अडलं कुठे? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.  'चर्चा नको आरक्षण हवं', अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.