शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

अटल सेतूमार्गे थेट पुणे बंगळुरू नवीन हायवे; नितीन गडकरींचा प्लॅन, कसा असेल हा रोड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:13 IST

पुण्यातील वाहतूक कोंडी अन् स्मार्ट सिटी यावर नितीन गडकरींनी भाष्य केले.  

पुणे - सध्याच्या काळात आधुनिक रस्ते आणि महामार्गामुळे अनेक शहरे एकमेकांना जोडली आहेत. प्रवासाचे अंतर कमी होत आहे. मात्र त्याचसोबत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अनेकदा वाहतूक कोंडी होते. पुण्यातही तीच परिस्थिती आहे. पुणे-बंगळुरू हायवेवरील कोंडीमुळे तासन्तास वाहने खोळंबतात. याच कोंडीतून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. मुंबई-बंगळुरू यामधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने नवीन हायवे बनवण्याचं ठरवलं असून त्याचे टेंडरही निघाल्याची घोषणा गडकरींनी केली. 

पुण्यातील एका कार्यक्रमात मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे जेव्हा आम्ही बांधला त्यावेळी पुढचे ५० वर्ष आता काही समस्या नाही असं आम्ही म्हणायचो, आज माझा मुलगा आणि त्याची पत्नी पुण्याला येत होते, मी नागपूरहून पुण्यात पोहचलो पण ते लोणावळ्यात १ तास अडकले होते. बरं झालं आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे असं त्यांनी म्हटलं. 

कसा असेल हा रोड?

अटल सेतूवरून उतरल्यानंतर तिथून थेट १४ लेनचा नवीन हायवे पुण्याच्या रिंगरोडला जोडून मुंबई ते बंगळुरू द्रुतगती महामार्गाचे काम पुढच्या सहा महिन्यात करायचं ठरवलेले आहे. या प्रकल्पाचे टेंडरही निघाले, कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवरील ५० टक्के वाहतूक त्या रोडवरून जाईल. अटल सेतूवरून तुम्ही नव्या पुणे एक्सप्रेसला लागले तर तिथून पुण्याच्या रिंगरोडला येणार आणि तिथून थेट बंगळुरूला जाणार. पुढे हाच रोड पुणे औरंगाबादला जोडणार, त्यामुळे पुण्याच्या आतमध्ये अडकणार नाही असं गडकरींनी सांगितले. 

गडकरींचा पुणेरी टोला

भारतीयांचे तसं सायन्स, टेक्नोलॉजी, रिसर्च, इनोव्हेशन यात उत्तम काम आहे तसं लोकसंख्या कशी वाढवायची हे तंत्रज्ञानही फार उत्तम मिळालं आहे. त्यामुळे ऑटो मोबाईल आणि पॉप्युलेशन ग्रोथ कुणी कितीही प्रयत्न करा, थांबतच नाही. पुण्याचे जे चित्र आहे त्याचे खरे कारण कृषी अर्थव्यवस्थेकडे आपण दुर्लक्ष केले त्याचे हे परिणाम आहेत. स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे असा पुणेरी टोला नितीन गडकरींनी लगावला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे