शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली?'; संजय राऊतांचा चढला पारा, काँग्रेसला अनेक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:39 IST

खासदार संजय राऊतांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले. मागील काळात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांवरून राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Sanjay Raut Congress: 'महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी-शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही', अशा शब्दात शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अलिकडेच काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये पार पडले. या अधिवेशानातील मुद्द्यावर आणि भूमिकांवर बोट ठेवत राऊतांनी  काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घातले.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संजय राऊतांनी काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल एका लेखातून भाष्य केले आहे. राऊत म्हटलं आहे की, 'काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मोदी-शाह यांच्या गुजरातमध्ये संपन्न झाले. अहमदाबादमध्ये काँग्रेसने अधिवेशन घेतले व राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली याला विशेष महत्त्व आहे. एरवी विरोधकांचा आवाज दडपण्याची एकही संधी न सोडणाऱ्या मोदी-शहांना गुजरातच्या भूमीवरून त्यांच्यावर झालेले हल्ले सहन करावे लागले. ‘घुसकर मारेंगे’ हा भाजपवाल्यांचा आवडता शब्दप्रयोग आहे. राहुल गांधी यांनी अहमदाबादेत घुसून मारले असेच म्हणावे लागेल."

वाचा >ईडीला अधिकार आहेत तसे लोकांनाही आहेत, त्यांचाही विचार करा, सर्वोच्च न्यायालयाने झापले

"मोदी-शाहांना त्यांच्याच जमिनीवर जाऊन आव्हान देण्याचा हा प्रयत्न चांगला आहे, पण त्यामुळे भारतात खरेच राजकीय क्रांती होईल काय?", असा सवाल राऊतांनी काँग्रेसला केला आहे. 

विधानसभेतील अपयशाला काँग्रेसही जबाबदार

राऊतांनी पुढे म्हटलं आहे की, "2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने शंभर जागा जिंकल्या. इंडिया आघाडीने मोदींना 240 वर रोखले, पण इंडिया आघाडीला सत्ता मिळवता आली नाही. ज्या गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने मोदींना आव्हान दिले, त्या राज्यात काँग्रेस लोकसभेची एकही जागा जिंकू शकली नाही. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातही काँग्रेसला मेहनत घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात लोकसभेत यश मिळाले, पण विधानसभेत मोठे अपयश पदरी पडले. त्यास भाजपचे घोटाळे जितके कारणीभूत आहेत, तेवढेच काँग्रेसअंतर्गत काही विषय जबाबदार आहेत. त्यावर मंथन झाले पाहिजे", असे खडेबोल राऊतांनी काँग्रेसला सुनावले आहेत. 

इंडिया आघाडीवरून संजय राऊतांचे सवाल

"लोकसभेच्या निकालानंतर ‘इंडिया आघाडी कोठे आहे?’ असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना काँग्रेसने गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणे गरजेचे होते. इंडिया आघाडीचे काय झाले? ती जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली? नक्की काय झाले? याचे उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षांवर आहे", असे म्हणत राऊतांनी काँग्रेसला घेरले. 

"काँग्रेसने स्वतःला मजबूत करायला हवे, पण भारतीय जनता पक्ष स्वतःला मजबूत करताना आपल्याच मित्रपक्षांचा, प्रादेशिक पक्षांचा घास गिळतो. अर्थात आजचे मोदींचे सरकार हे शेवटी प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांवरच टिकले आहे याकडे काँग्रेसने डोळसपणे पाहायला हवे. गुजरातच्या अधिवेशनात काँग्रेसने स्वतःपुरता विचार केला व भूमिकांची मांडणी केली. त्यात ‘इंडिया’ किंवा ‘भारत’ दिसत नाही. हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी काँग्रेसलाच पुढे यावे लागेल", अशी भूमिका राऊत यांनी मांडली आहे. 

तृणमूल सोबत आघाडीवरून काँग्रेसला सवाल

"दिल्लीत केजरीवाल यांच्या पराभवानंतर काँग्रेससाठी मैदान मोकळे झाले असे त्यांच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविक आहे. अनेक राज्यांत मैदान मोकळे करण्याचे तंत्र ते अवलंबणार असतील तर मोदी-शाहांची ते सेवा करीत आहेत असेच म्हणायला हवे. बिहार, गुजरात, प. बंगालच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस काय भूमिका घेणार आहे? की पुन्हा एकदा पराभवाचेच दिलखुलास स्वागत करणार?", असा सवाल राऊतांनी केला आहे. 

राऊत म्हणाले, रणशिंग फुंकले, पुढे काय?

"महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी-शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही. काँग्रेसने आपल्या जुन्या वाड्याचे नेपथ्य लावून भाषणे केली. वाडा लयास गेला आहे. तो उभारण्याची ताकद निर्माण करावी लागेल. जुन्या काळातून बाहेर पडून नवा विचार द्यावा लागेल. गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने रणशिंग फुंकले, पण पुढे काय?", असे म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घातले आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण