शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Ajit Pawar: शिंदे-फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? त्या मुद्द्यावरून अजित पवार भडकले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:48 IST

Ajit Pawar: शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआ सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरही अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे-फ़डणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? तुमची सत्ताही कधीतरी जाणारच आहे, असा इशारा त्यांनी दिला.

मुंबई - नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घणाघाती टीका केली आहे. या सरकारकडे जर बहुमत आहे तर त्यांनी तातडीने मंत्रिमंडळाचा विस्तार केला पाहिजे. तसेच राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआ सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरही अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे-फ़डणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? तुमची सत्ताही कधीतरी जाणारच आहे, असा इशारा त्यांनी दिला.

शिंदे सरकारकडून मविआ सरकारच्या काळातील निर्णयांना देण्यात येत असलेल्या स्थगितीवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत काम केलंय, त्यांनीच मागच्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका लावलाय. असं करण्याचं काहीच कारण नव्हतं. वास्तविक ही प्रक्रिया आहे. सरकारं येत असतात जात असतात. आता हे दोघे आलेत ते ताम्रपट घेऊन आलेत काय? हेही कधीतरी जाणारच आहेत. त्याचा विचार करायचा की नाही, असे अजित पवार म्हणाले.

२०२१ पर्यंतची कामं बंद करणं योग्य नाही. विकासाची कामं होती. महाराष्ट्रातील कामं होती, कुणाच्या घरादारातील कामं नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू य़ेथील नियोजित स्मारकाचा निधीही स्थगितीमुळे रखडलाय. राजर्षी शाहू महाजारांचा निधीही अडकलाय. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय असं खालच्या पातळीवरचं राजकारण महाराष्ट्रात झालं नव्हत. हे तातडीने थांबवा, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

यावेळी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरूनही अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अजूनपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे. आपणच सरकार चालवतोय हे बरं आहे, बाकीचा कुणाचा त्रास नाही, यामुळे त्यांचं चाललंय की आणखी काही कारणाने चाललंय, लोकशाहीत असं वागून चालत नाही. कारण असे प्रसंग येतात तेव्हा पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची भूमिका ठरते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार