शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:28 IST

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी नागपुरात "धर्म जागरण न्यास"च्या प्रांतीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी धर्माविषयी आपले विचार मांडले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी नागपुरात "धर्म जागरण न्यास"च्या प्रांतीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी धर्माविषयी आपले विचार मांडले. धर्म हा केवळ देवपूजेपुरता मर्यादित नसून, तो समाजाला एकत्र ठेवणारी आणि एकात्मतेला बळ देणारी शक्ती आहे. धर्मासाठी कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही, असे ते म्हणाले.

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, "धर्मकार्य हे केवळ देवासाठी नसून, समाजाच्या हितासाठी आहे. धर्म योग्य असेल, तर समाजही योग्य दिशेने जाईल. समाजात शांतता नांदेल, संघर्ष निर्माण होणार नाही, आणि विषमता कमी होईल. खऱ्या अर्थाने धर्म समजून घेऊन समाजाने वाटचाल केली, तरच सकारात्मक बदल घडू शकतो. भारताचा इतिहास धर्मासाठी केलेल्या त्यागांनी भरलेला आहे, धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले पण धर्म सोडला नाही."

भाषणात छावा चित्रपटाचा उल्लेख"धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा उपासना नसून, तो एक कर्तव्य आहे. मातृत्व धर्म, पितृत्व धर्म, पुत्र धर्म, मित्र धर्म, प्रजा धर्म आणि राजधर्म, हे सर्व धर्माचेच भाग आहेत. जो या धर्माचे पालन करतो, तोच खरा धार्मिक व्यक्ती आहे. आपल्या समाजातील सामान्य जनतेनेही धर्मासाठी मोठमोठे त्याग केले आहेत. छावा चित्रपटामध्ये दाखवलेले आदर्श हे आपल्या समाजाचेच प्रतिबिंब आहेत", असेही ते म्हणाले.

हा हिंदू धर्म नव्हे, तर मानव धर्म आहेमोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की, "हिंदू धर्म म्हणजे केवळ एका समाजाचा धर्म नसून तो प्रत्यक्षात मानव धर्म आहे, जो प्रथम हिंदूंनी ओळखला आणि आपल्या आचरणात आणला. आज जगभरात संघर्ष, पर्यावरणीय संकटे आणि सामाजिक विघटन यांचा सामना केला जात आहे, कारण विविधतेला कसे स्वीकारावे आणि हाताळावे हे अनेकांना ठाऊक नाही. आपल्या धर्माने हे आधीच करून दाखवले आहे, आणि आता जगाने हे शिकणे गरजेचे आहे."

धर्मामुळे सर्वांचे कल्याण शक्यभागवत यांनी जोर दिला की, "भारताने असा आदर्श जगासमोर ठेवला पाहिजे, ज्यातून हे स्पष्ट होईल की, धर्मानुसार जीवन जगल्यास व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत सर्वांचे कल्याण शक्य आहे. धर्म समजण्यासाठी ग्रंथ किंवा तर्काची नव्हे, तर थेट आचरणाची आवश्यकता आहे. जेव्हा धर्म कृतीत उतरतो, तेव्हाच खरे धर्म जागरण घडते आणि त्यातूनच जग शिकू शकते,” असे ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र