शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 08:31 IST

काँटे की टक्कर, २००४ सालच्या विधानसभेला डॉ.पद्मसिंह पाटील यांना त्यांचे चुलतबंधू पवनराजे यांनी तगडी लढत दिली होती

चेतन धनुरे

धाराशिव : विधानसभा असो की लोकसभा उस्मानाबाद मतदारसंघात  मागच्या २० वर्षांपासून पाटील-राजेनिंबाळकर घराण्यातच फाईट झाली आहे. दोन पिढ्यांपासून भावाभावातील लढतीच्या डिट्टो फिल्मी क्लायमॅक्समध्ये यंदा ऐनवेळी ट्वीस्ट आला अन् भाऊ विरुद्ध भाऊ ऐवजी दीर-भावजयीत लढतीची पटकथा लिहिली जातेय.

२००४ सालच्या विधानसभेला डॉ.पद्मसिंह पाटील यांना त्यांचे चुलतबंधू पवनराजे यांनी तगडी लढत दिली होती. या दोघांतील कौटुंबिक, राजकीय कलहाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीतील राणाजगजितसिंह पाटील व ओम राजेनिंबाळकर यांनी आजवर कायम राखला. आता यावेळी मात्र, ओमराजेंना राणा यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आव्हान दिले आहे. आजवरचा इतिहास पाहता ही लढत पुन्हा एकदा अत्युच्च टोकाची होण्याची चिन्हे असून, वंचित बहुजन आघाडीमुळे यात भर पडली आहे. यंदाचा पराभव कोण्या एकाला विजनवासात घेऊन जाणारा असल्याने दोन्हीकडे जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. 

फोन अन् कामांवरुन आरोप-प्रत्यारोपांची राळमहायुतीकडे लोकसभा क्षेत्रातील सहापैकी पाच आमदार आहेत. मदतीला माजी मंत्रीही आहेत. खा.ओमराजे यांची भिस्त ही एक आमदार, तीन माजी आमदार व कार्यकर्त्यांवर आहे. महायुतीकडून खासदारांची कामे काय असतात, त्यांनी पाच वर्षांत काहीच केले नाही, मोदींमुळे मतदारसंघातील कामे मार्गी लागल्याचे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. तर ओमराजेही आपण प्रत्येक व्यक्तीचे फोन घेऊन त्यांची कामे करतो असे सांगतानाच केलेल्या कामांची यादी सभांमधून वाचत आहेत. कामांवरुन होणारे आरोप-प्रत्यारोप आता वैयक्तिक पातळीवर पाझरु लागले आहेत. दुसरीकडे वंचितचे उमेदवार आंधळकर दोघांवरही घराणेशाहीचा आरोप करीत दंड थोपटून उभे आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

मी सर्वांचेच फोन उचलतो, कामे करतो, असा दावा खा. ओमराजे करतात. तर विरोधक खासदारांना विकास कामांवरुन प्रश्न उपस्थित करतात.कृष्णेचे पाणी, तुळजापूर रेल्वे, उद्योग, बेरोजगारी, शेतमालाचे भाव, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, रस्त्यांचे जाळे, कृषी सिंचन, सौर उर्जा.घराणेशाही तसेच संपत्तीवरुन उमेदवारांत होणारे आरोप-प्रत्यारोप, कमिशन-हप्ता वसुलीचाही होतोय सातत्याने आरोप.

गटातटाचा काय होणार परिणाम? महायुतीत जागा अजित पवार गटाला सुटल्याने शिंदेसेना नाराज आहे. त्यांचे पदाधिकारी प्रचारात कितपत सक्रीय होतात, यावर बरीच भिस्त आहे.  महाविकास आघाडीत गटबाजी दिसत नाही. मात्र, उद्धवसेना विश्वासात घेत नसल्याची खंत मित्रपक्ष खासगीत सांगतात. 

२०१९ मध्ये काय घडले?ओम राजेनिंबाळकर    शिवसेना (विजयी)    ५,९६,६४० राणा पाटील    राष्ट्रवादी काँग्रेस    ४,६९,०७४ अर्जुन सलगर    वंचित बहुजन आघाडी    ९८,५७९नोटा    -    १०,०२४   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४osmanabad-pcउस्मानाबादbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४