शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:51 IST

Dhananjay Munde News: संघर्षाच्या गोष्टींमागे विकास आणि कौतुकाच्या माळेच्या बहाण्याने मंत्रिपदाचा अर्जच धनंजय मुंडे यांनी दिल्याची चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

Dhananjay Munde News: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला सत्तेशी संघर्ष करायला शिकविले. समझोता केल्यानंतर नेतृत्व मोठे होत नाही, ही त्यांची शिकवण आमच्यात कायम आहे. हातातला कोरा कागद जरी त्यांनी पुरावा म्हणून दाखविला, तर त्यावर सभागृहाचा विश्वास असायचा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भर सभेत कौतुक केले. 

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सामील असलेल्या वाल्मीक कराड याच्याशी धनंजय मुंडे यांचा घनिष्ट संबंध असल्याचा आरोप करत विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. विरोधकांच्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर अनेक दिवस धनंजय मुंडे सक्रीय नव्हते. अलीकडेच ते पुन्हा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. यातच राजीनामा देऊनही धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला सोडला नसल्याचे समोर आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतण्यावरून सूतोवाच केले. यानंतर आता खुद्द धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भर सभेत तोंडभरून कौतुक केल्याने मंत्रि‍पदासाठी गळ घालण्याचा हा प्रयत्न होता का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

'संघर्ष' की मंत्रिपदाची गळ?

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी भाषणाची सुरुवातच 'संघर्ष पाचवीला पूजलेला' अशा ओळींनी केली. पुढे तोच सूर आळवत त्यांनी परळीच्या विकासाची मागणी केली. गोपीनाथ मुंडेंचा वारसा, संघर्ष यांचा उल्लेख करत त्यांनी फडणवीसांची स्तुती केली. एकदा नाही, तीनदा मुख्यमंत्री झालेत, हे खास अधोरेखित केलं. खुद्द धनंजय तीन वेळा मंत्री होते. त्यांच्या भगिनी पंकजाही मंत्री आहेत असे असतानाही त्यांनी 'परळी'चा नकाशा फडणवीसांच्या टेबलावर ठेवला. एकूणच, संघर्षाच्या गोष्टींमागे विकास आणि कौतुकाच्या माळेतून मतदारसंघाच्या हक्काची मागणी होती का? शिवाय अनावरणाच्या बहाण्याने मंत्रिपदाचा अर्जच दिल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, मुघलांना झोपेतही संताजी, धनाजी दिसायचे. त्याचप्रमाणे विधानसभेत गोपीनाथ मुंडे कोणता प्रश्न मांडणार, याची तत्कालीन सत्ताधाऱ्यांना धडकी भरायची. त्यांच्या संघर्षामुळेच भाजप सर्वात मोठा पक्ष झाला. सत्तेशी संघर्ष करण्याची शिकवण त्यांनीच आम्हाला दिली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत अभिवादन केले. गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधाऱ्यांना 'सळो की पळो' करून सोडले. अंडरवर्ल्डच्या विळख्यातून महाराष्ट्राला त्यांनी बाहेर काढले. गोपीनाथ मुंडे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन घडले. मुंडे यांना दिल्लीतून महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आणणारच होतो. परंतु, दुर्दैवाने ते होऊ शकले नाही, अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली.

 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस