शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

'जनतेचं घेण-देण नाही; मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणूक जिंकायची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 18:00 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का ? त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला.

मुंबई - बुधवारी रात्री पुण्यामध्ये अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शहरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत गेले आहेत. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील जनतेने 'या' सरकारचे काय घोडे मारले आहे हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे अशी खोचक टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का ? त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, पुण्यात प्रचंड पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर ११ लोकांचा मृत्यू झाला असून, राज्याचे मुख्यमंत्री मात्र दिल्लीत बसले असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी केला.

तर पश्चिम महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीच्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हेच केले होते. राज्यातील जनतेने भाजप सरकारचे काय घोडे मारले आहे. असा प्रश्न उपस्थित करत मुंडे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पुणे व परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भिषण परिस्थिती निर्माण झाली असताना तेथील नागरिकांना मदत  करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना निवडणूकांची काळजी असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी यावेळी केला.