शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

"आरोपी भाजपचा कार्यकर्ता, राजीनामा द्या"; विरोधकांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "अशा घटनांवेळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:15 IST

दोन चिमुकल्यांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे.

Badlapur School Case : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकणातील पीडितांच्या पालकांची तक्रार घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालकांना ११ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. आरोपीला अटक झाली असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाल्याचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवी असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

दोन चिमुकल्यांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आठवड्याभरानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. यावरुनच विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना विरोधी पक्ष संवेदनाहीन असल्याचे म्हटलं आहे.

मी तर असंही ऐकलं आहे की बदलापूरची ती शाळा भाजपच्या कार्यकर्त्यांशी संबंधित आहे. मात्र, मी यात राजकारण आणत नाही. तसा माझा हेतूही नाही. कोणताही कार्यकर्ता असला अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर लेकींना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

विरोधकांच्या मनामध्ये निव्वळ राजकारण - देवेंद्र फडणवीस

"विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो याचे दुर्दैव वाटते. संवेदनाहीन अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे. किमान ज्यावेळी अशा घडतात तेव्हा राजकारण करायाचं नसतं. विरोधकांच्या मनामध्ये निव्वळ राजकारणाशिवाय दुसरं काही नाही. तेच राजकारण बाहेर येत आहे. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं शोभत नाही. अशा संवेदनशील घटना घडतात तेव्हा त्यांनी राजकीय न वागता त्याठिकाणी  जनतेला काय देता येईल आणि न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारची वागायचं असतं. सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंना राजकारण करायचं आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळे