शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्रभौंनी एका वाक्यातच सांगून टाकलं, 'मुख्यमंत्री कुणाचा'!; तुम्ही ऐकलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 13:41 IST

आता शिवसेनेच्या वाघालाही फार गुरगुरता येईल असं वाटत नाही.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रगल्भतेचाच प्रत्यय शिवसेनेच्या स्थापना मेळाव्यात आला.शिवसेनेनं भाजपासोबत जागावाटपाचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित केला आहे.वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोणाचं हे सांगावं लागत नाही', असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू वृत्ती आणि हुशारी अनेकांना अनेक वर्षांपासून ठाऊक आहे. परंतु, गेल्या पाच वर्षात अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी स्वतःला मुरब्बी राजकारणी म्हणूनही सिद्ध केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या याच राजकीय प्रगल्भतेचाच प्रत्यय काल शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात आला. युतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कुणाचा असेल, भाजपा-शिवसेना अडीच-अडीच वर्षांसाठी हे पद वाटून घेणार का, यावरून सुरू असलेल्या चर्चेचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात देऊन टाकलं. हे वाक्य इतकं सूचक आहे की, आता शिवसेनेच्या वाघालाही फार गुरगुरता येईल असं वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीआधी युती करतानाच, शिवसेनेनं भाजपासोबत जागावाटपाचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित केला आहे. परंतु, मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांचं काय ठरलंय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात बरेच तर्कवितर्कही लढवले जात आहेत. या खुर्चीच्या वाटपावरून मोठा भाऊ-छोटा भाऊ यांच्यात थोडे रुसवे-फुगवेही असल्याचं बोललं जातंय. काही शिवसैनिकांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यासाठीच मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसतंय. त्यामुळे शिवसेनेच्या कालच्या ५३व्या स्थापना मेळाव्याबद्दल उत्सुकता होती. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी एकाच मंचावर येणार होते. त्यांच्या बोलण्यातून मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत काही संकेत मिळतात का, याकडे सगळ्यांचे कान लागले होते. बहुधा, त्यांची ही इच्छा ओळखूनच देवेंद्रभौंनी 'मन की बात' वेगळ्या शब्दांत सांगून टाकली.

'भाजपा-शिवसेना एकत्र आहेत आणि राहतील. वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोणाचं हे सांगावं लागत नाही', असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याचा एक अर्थ युतीचं सरकार येईल, असा असला तरी, जंगलाचा राजा वाघ नव्हे सिंह असतो, हेही त्यातून प्रतीत होतं. वाघ हे शिवसेनेचं, तर सिंह हे भाजपाचं प्रतीक आहे. त्यामुळे जंगलाचा राजा सिंह याचा अर्थ मुख्यमंत्री भाजपाचाच असाही घेता येतो. 

उद्धव ठाकरे यांचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी 'माझे मोठे बंधू' असा केला. आमचं सगळंच ठरलं आहे, योग्य वेळी जाहीर करू. तुम्ही युतीच्या विजयासाठी सज्ज व्हा, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना केलं. उद्धव यांनीसुद्धा, मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं ठरलंय, कोणी चिंता करू नये, अशी पुस्ती जोडली. अर्थात, युतीत सगळं समसमान असलं पाहिजे, अशी एक 'पुडी' सोडून उद्धव यांनी शिवसैनिकांच्या आशा पल्लवित केल्या. मुख्यमंत्र्यांकडे पाहून ते हसलेसुद्धा. पण नंतर लगेचच, आपण कार्यक्रमांबद्दल बोलतोय, युतीच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांचे नेते हवेत, असं म्हणत त्यांनी विषय बदलला.

दरम्यान, शिवसेनेच्या स्थापना मेळाव्याला अन्य राजकीय पक्षाचा नेता उपस्थित राहिलाय, त्यानं भाषण केलंय, असं अनेक वर्षांत घडलं नव्हतं. परंतु, उद्धव यांनी देवेंद्र फडणवीसांना आग्रहाचं आमंत्रण केलं. देशातील हवा पाहिल्यानंतर, विधानसभा निवडणूकही एकत्र लढवली पाहिजे आणि त्यासाठी एकीचा संदेश राज्यभरात पोहोचला पाहिजे, हा हेतू त्यामागे होता. तसंच, मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागलेल्या शिवसेनेतील नेत्यांना सूचक इशारा देण्याची उद्धवनीती म्हणूनही त्याकडे पाहिलं गेलं होतं.

 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपा