शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, जे रोज..."; देवेंद्र फडणवीसांचा सणसणीत टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 19:21 IST

कराड येथील कृषी प्रदर्शनाला देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत शेतकऱ्यांसाठी सरकारने आणलेल्या योजनांची माहिती दिली.

कराड - शहरात भरवलेल्या कृषी प्रदर्शनात ४२ लाखांचा बैल आलेला आहे. इथं इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे. बुटकी गायही आलेली आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. पण आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला. 

कराड येथे कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना तुमच्याकडे असेल तर सांगा. ते इतके टीव्हीवर बोलतात. त्यामुळे तुमच्याकडे काही योजना अथवा तंत्रज्ञान याठिकाणी आले असेल त्याचाही उपयोग कसा करता येईल हे आम्हाला तुम्ही शिकवा. हे अतिशय सुंदर  प्रदर्शन याठिकाणी भरवले त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकावं असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच आज राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. १ रुपयांत आपण पीकविमा योजना आणली. या वर्षी सातारा जिल्ह्यात २ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा घेतला तर ४५ हजार शेतकऱ्यांनी रब्बी पीकासाठी विमा घेतला आहे. विमा घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. ज्या भागात नैसर्गिक आपत्ती आली तिथे पहिल्यांदा विम्याची अग्रीम २५ टक्के रक्कम एक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतायेत आणि त्याचसोबत उर्वरीत पैसेही आपण शेतकऱ्यांना देतोय. नमो शेतकरी सन्मान योजना आणली. त्यातून केंद्र सरकार ६ हजार आणि राज्य सरकार ६ हजार रुपये वर्षाला देतायं. शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. नोंदणीकृत शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्याचा निर्णय आपण घेतला आहे अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून दिली. 

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आज आपण पूर्ण करतोय. कॅनेलने जाणाऱ्या पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी आता पाईपपद्धतीने सगळ्यांना पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. गावागावात पाणी पोहचवण्याचं काम आपलं सरकार करतंय. ज्याप्रकारे आपण काम करतोय ते पाहता सातारा जिल्ह्यात दुष्काळ पट्टा कायमचा नाहीसा होणार आहे. शेतकऱ्यांना सौर उर्जेवर कृषी पंपासाठी वीज देणार आहोत. त्यामुळे वर्षाला ३६५ दिवस २४ तास वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही शेतकऱ्यांसाठी हाती घेतला आहे असंही फडणवीसांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाFarmerशेतकरी