शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

"मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, जे रोज..."; देवेंद्र फडणवीसांचा सणसणीत टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 19:21 IST

कराड येथील कृषी प्रदर्शनाला देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत शेतकऱ्यांसाठी सरकारने आणलेल्या योजनांची माहिती दिली.

कराड - शहरात भरवलेल्या कृषी प्रदर्शनात ४२ लाखांचा बैल आलेला आहे. इथं इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे. बुटकी गायही आलेली आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. पण आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला. 

कराड येथे कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना तुमच्याकडे असेल तर सांगा. ते इतके टीव्हीवर बोलतात. त्यामुळे तुमच्याकडे काही योजना अथवा तंत्रज्ञान याठिकाणी आले असेल त्याचाही उपयोग कसा करता येईल हे आम्हाला तुम्ही शिकवा. हे अतिशय सुंदर  प्रदर्शन याठिकाणी भरवले त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकावं असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच आज राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. १ रुपयांत आपण पीकविमा योजना आणली. या वर्षी सातारा जिल्ह्यात २ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा घेतला तर ४५ हजार शेतकऱ्यांनी रब्बी पीकासाठी विमा घेतला आहे. विमा घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. ज्या भागात नैसर्गिक आपत्ती आली तिथे पहिल्यांदा विम्याची अग्रीम २५ टक्के रक्कम एक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतायेत आणि त्याचसोबत उर्वरीत पैसेही आपण शेतकऱ्यांना देतोय. नमो शेतकरी सन्मान योजना आणली. त्यातून केंद्र सरकार ६ हजार आणि राज्य सरकार ६ हजार रुपये वर्षाला देतायं. शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. नोंदणीकृत शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्याचा निर्णय आपण घेतला आहे अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून दिली. 

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आज आपण पूर्ण करतोय. कॅनेलने जाणाऱ्या पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी आता पाईपपद्धतीने सगळ्यांना पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. गावागावात पाणी पोहचवण्याचं काम आपलं सरकार करतंय. ज्याप्रकारे आपण काम करतोय ते पाहता सातारा जिल्ह्यात दुष्काळ पट्टा कायमचा नाहीसा होणार आहे. शेतकऱ्यांना सौर उर्जेवर कृषी पंपासाठी वीज देणार आहोत. त्यामुळे वर्षाला ३६५ दिवस २४ तास वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही शेतकऱ्यांसाठी हाती घेतला आहे असंही फडणवीसांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाFarmerशेतकरी