शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का; दादांनी घेतलेला निर्णय ८ दिवसांत बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 13:56 IST

अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक भाजपा नेते अडचणीत आले होते.

मुंबई – महायुतीच्या राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री आहेत. त्यातील एका उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी बदलला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना धक्का दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या निर्णयावरून विरोधकांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

एनसीडीसीने मंजूर केलेले ५४९ कोटींचे कर्ज हवे असल्यास कारखान्याच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामुहिक जबाबदारीचं हमीपत्र द्यावे. कारखान्याच्या जागेवर सातबाराचा बोजा चढवावा तसेच ग्राहक खत दस्तावेजावर हस्ताक्षराचे अधिकार सरकारला द्यावेत असे निर्बंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावले होते. या निर्णयामुळे कारखानदारांची कोंडी झाली होती. त्याचसोबत अनेक कारखानदार असलेले भाजपा नेतेही अडचणीत आले होते. मात्र अजित पवारांचा साखर कारखान्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी ८ दिवसांत मागे घेतलाय.

काय होत्या अटी?

  • कर्ज वसुली न झाल्यास कारखान्याच्या मालमत्तेच्या विक्रीतून कर्जाची वसुली
  • संचालक मंडळाचा ठराव देणाऱ्या कारखान्यांनाच कर्ज मिळेल
  • कारखान्याच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामुहिक जबाबदारीचं हमीपत्र द्यावे
  • कारखान्याच्या जागेवर सातबाराचा बोजा चढवावा
  • ग्राहक खत दस्तावेजावर हस्ताक्षराचे अधिकार सरकारला द्यावेत

 

याभाजपा नेत्यांना मिळाला दिलासा

  • विजयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री – शंकर सहकारी साखर कारखाना – ११३.४२ कोटी
  • हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री – शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना – १५० कोटी
  • अभिमन्यू पवार, भाजपा आमदार – शेतकरी सहकारी साखर कारखाना – ५० कोटी
  • रावसाहेब दानवे – केंद्रीय राज्यमंत्री – रामेश्वर सहकारी साखर कारखाना – ३४.७४ कोटी
  • धनंजय महाडिक – भाजपा खासदार – भीमा सहकारी साखर कारखाना – १२६.३८ कोटी

 

विरोधकांनी सरकारवर साधला निशाणा

अजित पवारांनी घेतलेला निर्णय भाजपा नेत्यांना अडचणीचा वाटल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. अजितदादांनी घेतलेला निर्णय हा फडणवीसांनी रद्द केला. दादांवर भाऊ भारी पडतोय. दादा-भाऊमध्ये पुणे, नागपूरमध्ये ठाणे कुठेच दिसत नाही, ठाणे गायब झालेले दिसते असं सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा