शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

Devendra Fadnavis: भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का दिलं? देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:51 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालीली ही कार्यकारिणीची बैठक आपल्या भाषणाने गाजवली. यावेळी तुफान फटकेबाजी करत, त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तर शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला.

मी एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करीन, एक हिंमतीचा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा, हा बाहेर पडला. ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला, तेव्हा ठरलं नव्हतं सरकार येईलच, कदाचीत असेही घडले असते, की एवढे लोक नसते आले तर त्यांचे राजकीय सामाजिक जीवन, कमावलेली पुण्याई कदाचित समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. अशा शब्दात आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. एवढेच नाही, तर आपण मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा का केली, याचा खुलाही फडणवीस यांनी यावेळी केला. ते पनवेलमध्ये सुरू असलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालीली ही कार्यकारिणीची बैठक आपल्या भाषणाने गाजवली. यावेळी तुफान फटकेबाजी करत, त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तर शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, त्यांनी (एकनाथ शिंदे) ठरवलं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांच्या विचारांशीच फारकत घेतली जात असेल, ज्यांच्यासोबत आम्ही लढाया केल्या त्यांच्याच अधिपत्याखाली आम्हाला काम करावं लागंत असेल, ज्यांच्याबद्दल स्वतः बाळासाहेब असं म्हणाले, की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा माझ्या पक्षाचं दुकान मी बंद करेन. त्यांच्याच सोबत जर जावं लागत असेल, ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सोबत जावं लागत असेल, एवढेच नाही, तर स्वा. सावरकरांचा रोज अपमान होत असताना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा, दाऊदशी संबंधित प्रकरणात मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्या विरोधात अक्षर बोलता येत नाही. त्याला मंत्री पदावरून काढायची हिंमत नेते दाखवू शकत नाही. अशा परिस्थितीत जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता, तो हे सहन करू शकत नव्हता.

हे सत्तेसाठी नाही, विचारासाठी झालेलं परिवर्तन- फडणवीस म्हणाले, हे सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठी झालेले परिवर्तन आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हे आवश्यक होतं आणि अनेक कथा-कहाण्या तयार झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, ही घोषणा झाली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. हे अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं. ते एवढे लोक घेऊन येत असताना, त्यांना नेतृत्व देणं महत्त्वाचं तर होतंच, पण त्याहूनही महत्वाचं होतं, तर भारतीय जनता पार्टी सत्तापिपासू नाही, आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो, अशांपैकी आम्ही नाही. तर आमची विचाराची लढाई आहे. आता जी मायनॉरिटीत आली आहे, त्या शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली. आता एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना आहे. 

तेव्हा आमच्यासोबत षड्यंत्र झालं -फडणवीस म्हणाले, 'त्या'  ठिकाणी कुठलाही शब्द दिलेला नव्हता (मुख्यमंत्रीपदासंदर्भात). मी स्वतः त्यांच्या सोबत बसलेलो होतो. आमच्यासोबत षड्यंत्र झालं. आमच्या जागा पाडण्यात आल्या. चंद्रकांतदादा, आपण भोळे लोक आहोत. युतीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून बंडखोर मागे घेतले. त्यांच्यासाठी हवी ती मदत केली. पण, त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. नंबर गेम फसतो की नाही, याची ते वाट बघत होते. निकाल यायच्या आधीच, आमचे सगळे मार्ग खुले आहेत, असे त्यांनी म्हटले होते. मी फोन करत होतो, पण ते फोन घेत नव्हते. कारण त्यांचं ठरलं होतं. पण काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत झाली, त्याच निर्णयात आजच्या परिस्थितीचं बीजारोपण, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेBJPभाजपा