शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

'देवेंद्रभाऊ, तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 12:58 IST

काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांचा खोचक सल्ला

नागपूर: सत्ता गमावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरु रामदेव बाबांकडे जाऊन आत्मचिंतन करावं असा सल्ला काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. फडणवीसांना पराभवाचं आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जायला हवं, असं केदार म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपानं जोर लावला आहे. सत्ता गेल्यानं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. तर राज्यात सत्ता स्थापन केल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजपाला लक्ष्य केलं. फडणवीस यांनी पाच वर्षे सत्ता कोणासाठी वापरली, पक्ष संघटना किती बळकट केली, हे आता कळेलच. आपल्याला जनतेनं का पराभूत केलं याचं चिंतन त्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जावं, असा टोला केदार यांनी लगावला. यावेळी त्यांना माजी मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बावनकुळेंना त्यांच्याच पक्षानं चिंतन करण्यास सांगितलं आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असा सवाल करत चिमटा काढला. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीही नागपूर जिल्हा परिषदेत शिवसेना स्वतंत्र लढत आहे. निवडणूक निकालानंतर नागपुरमध्ये महाविकास आघाडी दिसणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला त्याची गरज भासणार नाही, असं उत्तर केदार यांनी दिलं. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यामुळे इतर गोष्टींची चर्चा नको, असं केदार म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSunil Kedarसुनील केदारcongressकाँग्रेसBJPभाजपा