शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'देवेंद्रभाऊ, तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 12:58 IST

काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांचा खोचक सल्ला

नागपूर: सत्ता गमावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरु रामदेव बाबांकडे जाऊन आत्मचिंतन करावं असा सल्ला काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. फडणवीसांना पराभवाचं आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जायला हवं, असं केदार म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपानं जोर लावला आहे. सत्ता गेल्यानं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. तर राज्यात सत्ता स्थापन केल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजपाला लक्ष्य केलं. फडणवीस यांनी पाच वर्षे सत्ता कोणासाठी वापरली, पक्ष संघटना किती बळकट केली, हे आता कळेलच. आपल्याला जनतेनं का पराभूत केलं याचं चिंतन त्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जावं, असा टोला केदार यांनी लगावला. यावेळी त्यांना माजी मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बावनकुळेंना त्यांच्याच पक्षानं चिंतन करण्यास सांगितलं आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असा सवाल करत चिमटा काढला. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीही नागपूर जिल्हा परिषदेत शिवसेना स्वतंत्र लढत आहे. निवडणूक निकालानंतर नागपुरमध्ये महाविकास आघाडी दिसणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला त्याची गरज भासणार नाही, असं उत्तर केदार यांनी दिलं. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यामुळे इतर गोष्टींची चर्चा नको, असं केदार म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSunil Kedarसुनील केदारcongressकाँग्रेसBJPभाजपा