शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

'देवेंद्रभाऊ, तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 12:58 IST

काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांचा खोचक सल्ला

नागपूर: सत्ता गमावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरु रामदेव बाबांकडे जाऊन आत्मचिंतन करावं असा सल्ला काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. फडणवीसांना पराभवाचं आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जायला हवं, असं केदार म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपानं जोर लावला आहे. सत्ता गेल्यानं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. तर राज्यात सत्ता स्थापन केल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजपाला लक्ष्य केलं. फडणवीस यांनी पाच वर्षे सत्ता कोणासाठी वापरली, पक्ष संघटना किती बळकट केली, हे आता कळेलच. आपल्याला जनतेनं का पराभूत केलं याचं चिंतन त्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जावं, असा टोला केदार यांनी लगावला. यावेळी त्यांना माजी मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बावनकुळेंना त्यांच्याच पक्षानं चिंतन करण्यास सांगितलं आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असा सवाल करत चिमटा काढला. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीही नागपूर जिल्हा परिषदेत शिवसेना स्वतंत्र लढत आहे. निवडणूक निकालानंतर नागपुरमध्ये महाविकास आघाडी दिसणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला त्याची गरज भासणार नाही, असं उत्तर केदार यांनी दिलं. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यामुळे इतर गोष्टींची चर्चा नको, असं केदार म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSunil Kedarसुनील केदारcongressकाँग्रेसBJPभाजपा