शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

Devendra Fadanvis: "येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता आणणार"; देवेंद्र फडणवीसांची गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:01 IST

Devendra Fadanvis: "आम्ही या भ्रष्टाचारी महावसुली सरकारचा बुर्खा फाडल्याशिवाय राहणार नाहीत."

नागपूर: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखली. यात गोव्याचाही समावेश आहे. या गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या खांद्यावर होती. गोव्यातील विजयानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपूरला आले, यावेळी नागपूरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील यावेळी उपस्थित होते. यादरम्यान जनतेला संबोदित करताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले, ''सध्या महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट येत आहे. या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात भाजपच्या लढ्यात सामान्य माणूस सोबत आहे. आम्ही या भ्रष्टाचारी सरकारचा बुर्खा फाडतोय, त्यामुळेच सामान्यांना लक्षात येतंय की, ही महाविकास नाही, महावसुली आघाडी आहे. या आघाडीचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहे. आता लढाई शिगेला पोहचतेय. आपल्या नेत्यांविरोधात खोटे केसेस टाकल्या, पण मला सरकारला सांगायचं आहे, तुम्ही कितीही केसेस करा, आम्ही तुमचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होणार, भाजप एकहाती सत्ता आणणार'', अशी गर्जना यावेळी फडणवीसांनी केली.

'गोव्याच्या जनतेचा आमच्यावर विश्वास'ते पुढे म्हणाले की, ''विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. पण, हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर भाजपचा आहे. गोव्यात काम करण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी मी भाजपचा आभारी आहे. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मदतीनेच मी संधीचे सोने केले. प्रचारादर्यान, नितीन गडकरीजी गोव्यात आले होते, तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले होते की, गेल्यावेळी तुम्ही एकटा आलात आणि सरकार स्थापन केले. त्यावर गडकरी म्हणाले होते, आता मी आणि देवेंद्र फडणवीस आहोत. आम्ही दोघे मिळून सरकार स्थापन करणार. झालेही तसेच, गोव्याच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही पुन्हा सत्ता आलो.''

'राष्ट्रवादी-सेनेची लढाई नोटाशी'यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोव्यातील युतीवर टोलाही लगावला. ''देशातील जनतेचा भाजपवर प्रचंड विश्वास आहे. मोदींचे नेतृत्व देशाला पुढे नेईल, असे लोकांना वाटते, म्हणूनच भाजपचा पाठिंबा वाढतोय. आमचे विरोधक देव पाण्यात टाकून बसले होते. 10 तारखेला भाजपचे सरकार जाईल म्हणायचे. पण, त्यांचे मुंगेरी लाल के हसीन सपने राहिले. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केली, आम्ही निवडून येणार अशी गर्जनाही केली. पण, सेना-राष्ट्रवादीची लढाई आमच्याशी नाही, तर 'नोटा'शी होती. दोन्ही पक्षांना नोटापेक्षा कमी मते मिळाली, त्यांचे डिपॉजीटही जप्त झाले,'' असा टोला त्यांनी लगावला.

'मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला'फडणवीस पुढे म्हणाले, ''गोवा असो, उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड किंवा मणिपूर असो, भाजपला मिळालेले मत देशाच्या विकासावर आणि नरेंद्र मोदींच्या विश्वासावर मिळाले आहेत. नरेंद्र मोदींच्या, गडकरींच्या नेतृत्वात देशाचा मोठा विकास झालाय. भाजपने आणलेल्या विकासाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचल्या. कोणीही उपाशी राहणार नाही, हे ब्रिद वाक्य मोदींचे होते. लॉकडाऊनच्या काळात कोणालाही उपाशी राहु दिले नाही. मोदींच्या नेतृत्वात लसीकरण झाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणले. त्यामुळेच देशातील लोकांचा भाजपवर विश्वास वाढत आहे,''असेही ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा