शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

Devendra Fadanvis: "येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता आणणार"; देवेंद्र फडणवीसांची गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:01 IST

Devendra Fadanvis: "आम्ही या भ्रष्टाचारी महावसुली सरकारचा बुर्खा फाडल्याशिवाय राहणार नाहीत."

नागपूर: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखली. यात गोव्याचाही समावेश आहे. या गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या खांद्यावर होती. गोव्यातील विजयानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपूरला आले, यावेळी नागपूरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील यावेळी उपस्थित होते. यादरम्यान जनतेला संबोदित करताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले, ''सध्या महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट येत आहे. या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात भाजपच्या लढ्यात सामान्य माणूस सोबत आहे. आम्ही या भ्रष्टाचारी सरकारचा बुर्खा फाडतोय, त्यामुळेच सामान्यांना लक्षात येतंय की, ही महाविकास नाही, महावसुली आघाडी आहे. या आघाडीचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहे. आता लढाई शिगेला पोहचतेय. आपल्या नेत्यांविरोधात खोटे केसेस टाकल्या, पण मला सरकारला सांगायचं आहे, तुम्ही कितीही केसेस करा, आम्ही तुमचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होणार, भाजप एकहाती सत्ता आणणार'', अशी गर्जना यावेळी फडणवीसांनी केली.

'गोव्याच्या जनतेचा आमच्यावर विश्वास'ते पुढे म्हणाले की, ''विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. पण, हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर भाजपचा आहे. गोव्यात काम करण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी मी भाजपचा आभारी आहे. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मदतीनेच मी संधीचे सोने केले. प्रचारादर्यान, नितीन गडकरीजी गोव्यात आले होते, तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले होते की, गेल्यावेळी तुम्ही एकटा आलात आणि सरकार स्थापन केले. त्यावर गडकरी म्हणाले होते, आता मी आणि देवेंद्र फडणवीस आहोत. आम्ही दोघे मिळून सरकार स्थापन करणार. झालेही तसेच, गोव्याच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही पुन्हा सत्ता आलो.''

'राष्ट्रवादी-सेनेची लढाई नोटाशी'यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोव्यातील युतीवर टोलाही लगावला. ''देशातील जनतेचा भाजपवर प्रचंड विश्वास आहे. मोदींचे नेतृत्व देशाला पुढे नेईल, असे लोकांना वाटते, म्हणूनच भाजपचा पाठिंबा वाढतोय. आमचे विरोधक देव पाण्यात टाकून बसले होते. 10 तारखेला भाजपचे सरकार जाईल म्हणायचे. पण, त्यांचे मुंगेरी लाल के हसीन सपने राहिले. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केली, आम्ही निवडून येणार अशी गर्जनाही केली. पण, सेना-राष्ट्रवादीची लढाई आमच्याशी नाही, तर 'नोटा'शी होती. दोन्ही पक्षांना नोटापेक्षा कमी मते मिळाली, त्यांचे डिपॉजीटही जप्त झाले,'' असा टोला त्यांनी लगावला.

'मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला'फडणवीस पुढे म्हणाले, ''गोवा असो, उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड किंवा मणिपूर असो, भाजपला मिळालेले मत देशाच्या विकासावर आणि नरेंद्र मोदींच्या विश्वासावर मिळाले आहेत. नरेंद्र मोदींच्या, गडकरींच्या नेतृत्वात देशाचा मोठा विकास झालाय. भाजपने आणलेल्या विकासाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचल्या. कोणीही उपाशी राहणार नाही, हे ब्रिद वाक्य मोदींचे होते. लॉकडाऊनच्या काळात कोणालाही उपाशी राहु दिले नाही. मोदींच्या नेतृत्वात लसीकरण झाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणले. त्यामुळेच देशातील लोकांचा भाजपवर विश्वास वाढत आहे,''असेही ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा