शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

देवेंद्र और हम है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ; मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 18:16 IST

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीबाबत विधानसभेत विधेयक मांडण्यात आले. त्यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुंबई - देवेंद्र और हम है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ, मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?, आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेची जी मागणी आहे तीच आम्ही पूर्ण करतोय. राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी सरपंच थेट जनतेतून निवडा असा ठराव केला होता. आम्ही सरकार अल्पमतात गेले त्याचे पत्र पाठवलं त्यानंतर मविआ सरकारनं ४०० जीआर काढले मग ते थांबवणार का नाही असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना विचारले. 

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीबाबत विधानसभेत विधेयक मांडण्यात आले. त्यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, १९७४ मध्ये थेट नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १९८५ मध्ये हा निर्णय बदलत नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००६ मध्ये पुन्हा नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. मविआत अनेक निर्णय घेतले आणि बदललेही. अजितदादा तुमच्या मनातून हा निर्णय आला आहे हे भाषणातून दिसत होते. अख्ख्या शहरात दहशत माजवून कुणी वर्चस्व निर्माण करू शकत नाही असं शिंदेंनी सांगितले. 

तसेच जेव्हा नगराध्यक्ष नगरसेवकांमधून निवडतो तेव्हा जो ताकदवान असतो तो इतर पक्षातीलही नगरसेवक स्वत: सोबत घेऊ शकतो. त्यामुळे पारदर्शकता आणणं महत्त्वाचं. विरोधाला विरोध समजू शकतो. जेव्हा दिल्लीला आपले ३ नेते गेले. अजित पवार, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री गेले होते. तेव्हा भुजबळ मला म्हणाले होते चाललंय ते सगळं ओके आहे ना. अजित पवारांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या. काय चाललंय कसं चाललंय. एकदम ओक्के होईल. जे काही घडलं का घडलं त्यावर भाष्य करत नाही. नितेश राणेंनी त्याचा थोडा उल्लेख केलाय असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान, घटनेच्या तरतुदीप्रमाणे मुख्यमंत्री निवड होते. परंतु नगराध्यक्ष निवडीबाबत राज्याला अधिकार दिलेत. मग अजित पवारांच्या बोलण्याचा अर्थ घटनेत बदल करा असा होता. बोलण्याच्या ओघात माणूस बोलतो. या विधेयकासाठी विधी न्याय विभागाची मान्यता घेतली आहे. भास्कर जाधवांनी नगरविकास खात्याबाबत सगळं सांगितले. जनतेतून सरपंच निवडावा ही मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने केली आहे. जनता बोलणार तेच आम्ही करणार असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा