शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देवेंद्र और हम है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ; मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 18:16 IST

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीबाबत विधानसभेत विधेयक मांडण्यात आले. त्यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुंबई - देवेंद्र और हम है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ, मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?, आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेची जी मागणी आहे तीच आम्ही पूर्ण करतोय. राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी सरपंच थेट जनतेतून निवडा असा ठराव केला होता. आम्ही सरकार अल्पमतात गेले त्याचे पत्र पाठवलं त्यानंतर मविआ सरकारनं ४०० जीआर काढले मग ते थांबवणार का नाही असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना विचारले. 

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीबाबत विधानसभेत विधेयक मांडण्यात आले. त्यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, १९७४ मध्ये थेट नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १९८५ मध्ये हा निर्णय बदलत नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००६ मध्ये पुन्हा नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. मविआत अनेक निर्णय घेतले आणि बदललेही. अजितदादा तुमच्या मनातून हा निर्णय आला आहे हे भाषणातून दिसत होते. अख्ख्या शहरात दहशत माजवून कुणी वर्चस्व निर्माण करू शकत नाही असं शिंदेंनी सांगितले. 

तसेच जेव्हा नगराध्यक्ष नगरसेवकांमधून निवडतो तेव्हा जो ताकदवान असतो तो इतर पक्षातीलही नगरसेवक स्वत: सोबत घेऊ शकतो. त्यामुळे पारदर्शकता आणणं महत्त्वाचं. विरोधाला विरोध समजू शकतो. जेव्हा दिल्लीला आपले ३ नेते गेले. अजित पवार, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री गेले होते. तेव्हा भुजबळ मला म्हणाले होते चाललंय ते सगळं ओके आहे ना. अजित पवारांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या. काय चाललंय कसं चाललंय. एकदम ओक्के होईल. जे काही घडलं का घडलं त्यावर भाष्य करत नाही. नितेश राणेंनी त्याचा थोडा उल्लेख केलाय असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान, घटनेच्या तरतुदीप्रमाणे मुख्यमंत्री निवड होते. परंतु नगराध्यक्ष निवडीबाबत राज्याला अधिकार दिलेत. मग अजित पवारांच्या बोलण्याचा अर्थ घटनेत बदल करा असा होता. बोलण्याच्या ओघात माणूस बोलतो. या विधेयकासाठी विधी न्याय विभागाची मान्यता घेतली आहे. भास्कर जाधवांनी नगरविकास खात्याबाबत सगळं सांगितले. जनतेतून सरपंच निवडावा ही मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने केली आहे. जनता बोलणार तेच आम्ही करणार असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा