शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:38 IST

Dasara Melava 2025: राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, शेतकरी बांधवांवर कोसळलेले अस्मानी संकट अशा कठीण परिस्थितीचा विचार करता दसरा मेळावे घेण्यावरून राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Dasara Melava 2025: मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वस्त्या-शिवारे जलमय झाली आहेत. सोलापूर, नंदुरबार, आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाने पुन्हा कहर केला आहे. विदर्भात अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगदी काही दिवसांत नवरात्रोत्सवाची सांगता होत आहे. दसऱ्याला पक्षांकडून मेळावे घेतले जातात. आता यावरून राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होतो. शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर एकनाथ शिंदे हेही शिवसेनेचा दसरा मेळावा घेतात. तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे भगवान गडावर दसरा मेळावा घेतात. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मेळावा होतो. यासह राज्यातील विविध भागात दसरा मेळावे उत्साहात साजरे केले जातात. परंतु, राज्यातील कठीण परिस्थितीचा विचार करून दसरा मेळावे घेण्यावरून राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर उत्तर देताना, मला याबाबत काही बोलायचे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते प्रगल्भ आहेत. ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत. दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन त्यांनी निर्णय घ्यावा, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते. शेतीचे प्रचंड नुकसान होते. जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. आता तातडीची पाच हजार रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. 

दरम्यान, मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांचे सगळे उद्ध्वस्त झाले आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत. उद्धवराव, आता वेळ आहे कृती करायची… मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल, अशी पोस्ट केशव उपाध्ये यांनी एक्सवर केली. परंतु, याला उत्तर देताना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणारच, असे ठामपणे सांगताना उद्धवसेनेचे नेते महेश सावंत यांनी भाजपावर टीका केली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar urges reflection on Dasara Melava amidst flood crisis.

Web Summary : Amidst Marathwada floods, Ajit Pawar suggests leaders thoughtfully decide on Dasara Melava celebrations. He acknowledged farmer distress and promised immediate relief measures. Political debates continue, with calls to cancel events and aid flood victims.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDasaraदसराPoliticsराजकारण