शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार; सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम सांगितला; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 16:16 IST

सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळलीये, असा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला होता.

सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळलीये, असा आरोप करणाऱ्या विरोधकांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शिर्डीतील अधिवेशनात ते बोलत होते. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला अन् या प्रकरणातील तपासातून समोर आलेल्या गोष्टींतून खरं काय ते समोर आले आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. एवढेच नाही तर नवा मुद्दा आला की, ते 'फेक नरेटिव्ह' सेट करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही यावेळी अजित पवारांनी विरोधकांवर केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली का? 

शिर्डीतील अधिवेशनातील आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले की, एखादी बातमी येते अन् त्याची शहानिशा न करता विरोधक त्यावर ठोकून बोलायला लागतात. सिनेस्टर सैफ अली खानच्या घरात एक चोरटा शिरला. त्याच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर काहींनी थेट मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली, अशी वक्तव्ये केली. आता एका घरात एक चोरटा शिरला की, लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली का? असा प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. जे घडलं ते होता कामा नयेच, मी त्या चोरट्याचं समर्थन करत नाही, असेही ते म्हणाले.

 त्याला माहिती पण नव्हतं ते नटाचं घर आहे की नटीचं! ते पुढे म्हणाले की, या घटनेनंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि तो ठाण्यामध्ये सापडला. त्यानं सगळं कबुल केलं. आठ महिन्यापूर्वी तो बांगलादेश सोडून कोलकाता येथे आला. मुंबईसंदर्भात बरंच ऐकलं होतं म्हणून जीवाची मुंबई करायला इकडं मुंबईत आला. हाउस किंपिंगच काम केलं. ज्या एजन्सीकडे तो काम करत होता त्यांनी त्याचे आधार कार्ड वैगेरे आवश्यक कादपत्रे पाहून शहानिशा न करता त्याला काम दिले. याप्रकरणात त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात आलीये. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व धागेदोरे शोधून काढले आहेत. त्याला माहिती पण नव्हतं ते नटाचं घर आहे की नटीचं! कुणीतरी त्याला सांगितल होतं की इथं सर्व श्रीमंत लोक राहतात. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने तो तिथं गेला होता, हा सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम त्यांनी सांगितला. 

'फेक नेरेटिव्ह सेट' करण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा विरोधकांवर आरोप 

हे सांगायचं तात्पर्य एवढंच की, तुमच्या माझ्या महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी महायुतीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करते आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विरोधकांकडे कोणता मुद्दाच राहिला नाही नवीन मुद्दा कुठला आला की, लगेच  फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु होतो, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईshirdiशिर्डीSaif Ali Khanसैफ अली खान