शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार; सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम सांगितला; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 16:16 IST

सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळलीये, असा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला होता.

सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळलीये, असा आरोप करणाऱ्या विरोधकांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शिर्डीतील अधिवेशनात ते बोलत होते. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला अन् या प्रकरणातील तपासातून समोर आलेल्या गोष्टींतून खरं काय ते समोर आले आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. एवढेच नाही तर नवा मुद्दा आला की, ते 'फेक नरेटिव्ह' सेट करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही यावेळी अजित पवारांनी विरोधकांवर केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली का? 

शिर्डीतील अधिवेशनातील आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले की, एखादी बातमी येते अन् त्याची शहानिशा न करता विरोधक त्यावर ठोकून बोलायला लागतात. सिनेस्टर सैफ अली खानच्या घरात एक चोरटा शिरला. त्याच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर काहींनी थेट मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली, अशी वक्तव्ये केली. आता एका घरात एक चोरटा शिरला की, लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली का? असा प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. जे घडलं ते होता कामा नयेच, मी त्या चोरट्याचं समर्थन करत नाही, असेही ते म्हणाले.

 त्याला माहिती पण नव्हतं ते नटाचं घर आहे की नटीचं! ते पुढे म्हणाले की, या घटनेनंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि तो ठाण्यामध्ये सापडला. त्यानं सगळं कबुल केलं. आठ महिन्यापूर्वी तो बांगलादेश सोडून कोलकाता येथे आला. मुंबईसंदर्भात बरंच ऐकलं होतं म्हणून जीवाची मुंबई करायला इकडं मुंबईत आला. हाउस किंपिंगच काम केलं. ज्या एजन्सीकडे तो काम करत होता त्यांनी त्याचे आधार कार्ड वैगेरे आवश्यक कादपत्रे पाहून शहानिशा न करता त्याला काम दिले. याप्रकरणात त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात आलीये. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व धागेदोरे शोधून काढले आहेत. त्याला माहिती पण नव्हतं ते नटाचं घर आहे की नटीचं! कुणीतरी त्याला सांगितल होतं की इथं सर्व श्रीमंत लोक राहतात. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने तो तिथं गेला होता, हा सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम त्यांनी सांगितला. 

'फेक नेरेटिव्ह सेट' करण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा विरोधकांवर आरोप 

हे सांगायचं तात्पर्य एवढंच की, तुमच्या माझ्या महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी महायुतीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करते आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विरोधकांकडे कोणता मुद्दाच राहिला नाही नवीन मुद्दा कुठला आला की, लगेच  फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु होतो, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईshirdiशिर्डीSaif Ali Khanसैफ अली खान