शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

'तुम्ही मागाल ते मिळणार नाही, व्यवहारी ताेडगा काढावा लागेल' उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एसटी आंदाेलकांना सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 18:42 IST

Ajit Pawar on ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा काढण्याचा महाविकास आघाडी सरकार मनापासून प्रयत्न करत आहे. तुम्ही मागाल तेच मिळणार नाही. त्यामध्ये व्यवहारी ताेडगा काढावा लागेल, असा इशारा वजा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिला.

रायगड - एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा काढण्याचा महाविकास आघाडी सरकार मनापासून प्रयत्न करत आहे. तुम्ही मागाल तेच मिळणार नाही. त्यामध्ये व्यवहारी ताेडगा काढावा लागेल, असा इशारा वजा सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिला. श्रीवर्धन-दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापणा आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.अजीत पवार हे नेहमीच आपल्या सडेताेड व्यक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत. पवार यांची आंदाेलकांप्रती कणव असली तरी, त्यांचे हे व्यक्तव्य आंदाेलक कशा पद्धतीने घेतात हे पाहणे आैत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकार दाेन पावल माग यायला तयार आहे, तुम्हीही दाेन पावल मागे या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आंदाेलकांना केले. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर सरकार प्रामाणिकपणे ताेडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू आंदाेलनाला नेतृत्वच नसल्याने चर्चा काेणा बराेबर करायची असा सवाल पवार यांनी केला. एसटी ही सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन आहे. शेतकरी, कष्टकरी, गरीब, विद्यार्थी यांचे हाल हाेत आहेत. त्यामुळे आंदाेलकांनी आपले आंदाेलन तानून धरु नये. ताणल्याने तुटते, असेही पवार यांनी स्पष्ट केले.अन्य राज्या प्रमाणे तेथील चालक, वाहक यांना पगार अथवा मानधन देण्यात येते. तशा पध्दतीने तुम्हाला देण्याबाबतचा प्रयत्न आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन करु या. मुख्यमंत्री देखील याला पाठींबा देतील. तुम्ही विश्र्वास ठेवा असेही पवार यांनी सांगितले.

कोकणातील फळ प्रक्रीया उद्योग वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. येथील फळापासून वाईन तयार करण्याबाबत सरकार विचार करत आहे. त्यामुळे फळ कारखानदारीला निश्चितपणे बळ मिळेल असा विश्र्वास पवार यांनी व्यक्त केला. अलिबाग-विरार या काॅरीडाॅरसाठी सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. १२६ किलोमिटरचा हा मार्ग विकासाचा मार्ग ठरेल असेही पवार यांनीृ सांगितले. अलिबाग तालुक्यातील रेवस ते सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रेड्डी या ५४० किलोमिटर लांबीच्या सागरी महामार्गाचा विकास करण्यात येत आहे. त्यासाठी तब्बल ९ हजार ५७३ कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याकडेह पवार यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार