शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे जबाबदारी आली अन् "सारथी" ला पुन्हा स्वायत्तता मिळाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 20:49 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे जबाबदारी देताच सारथी संस्थेत सकारात्मक बदल सुरू

ठळक मुद्देआवश्यक उपक्रम, कल्याणकारी योजना यांची निवड व अंमलबजावणी करता येणार

पुणे : राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर  मराठा समाजातील तरुण-तरुणीच्या विकासासाठी स्थापन केलेल्या  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्वायत्ता काढून घेतली होती. याबाबत गेले वर्षभर शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होते. अखेर आंदोलनाला यश आले असून, शासनाने गुरूवार (दि.१५ ) रोजी स्वतंत्र अद्यादेश काढून सारथी संस्थेला पुन्हा एकदा "स्वायत्ता" देण्यात आली आहे. 

मराठी समाजातील तरुण मुला-मुलींच्या हितासाठी बार्टी, यशदा सारख्या संस्थांच्या धर्तीवर तत्कालीन सरकारने ‘सारथी’ या स्वयत्त संस्थेची स्थापन केली होती. परंतु राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ‘सारथी’ संस्थेची स्वयत्तता काढून घेण्यात आली. त्यानंतर हा प्रश्न चांगलाच गाजत आहे. सारथी संस्थेच्या मुद्यावरुन मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले.

 खासदार संभाजीराजे यांनी देखील पुण्यात येऊन सारथी संस्थेच्या बाहेर आंदोलन केले. मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी सारथी संस्थेची सर्व जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली. सारथीची जबाबदारी पवार यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी देखील तातडीने संस्थेला निधी उपलब्ध करून दिला. स्वत: भेट देऊन अडचणी समजून घेतल्या, संचालक मंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. अजित पवार यांच्यामुळे अखेर सारथी संस्थेत बदल होण्यास सुरुवात झाली आहे. 

शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सारथी संस्थेला आवश्यक ते उपक्रमे , कल्याणकारी योजना याची निवड करुन अंमलबजावणी करता येईल.  संबंधित प्रशासकीय विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येणारे तत्सम उपक्रम व कल्याणकारी योजनाबाबत निश्चित करण्यात आलेले आर्थिक निकष व प्रशासकीय पध्दत इत्यादी विचारात घेऊन "संचालक मंडळ" स्तरावर उचित निर्णय घेता येईल. या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक यांना पूरक,उद्दिष्टे साध्य करण्यासाठी "संचालक मंडळ संबधित प्रशासकीय विभागाकडून पूर्व सहमती घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारmarathaमराठाState Governmentराज्य सरकार