शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

देशात लोकशाही जगली पाहिजे, लोकांची डोकी काय फोडताय?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:12 IST

लोकांवर जोरजबरदस्ती करण्याची गरज काय? चांगले प्रकल्प आणा, आम्ही विकासाच्या आड येत नाही असंही स्पष्टीकरण ठाकरेंनी दिले. 

मुंबई - न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या अंमलाखाली घेण्याची तयारी झालीय. न्यायमूर्ती कोण हेच ठरवणार. इस्त्राईलमध्येही तेच झाले. लाखो लोक रस्त्यावर उतरले. पंतप्रधान बाहेर पडू शकत नव्हते इतका जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. भारत देशात लोकशाही जगली पाहिजे. सर्वसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे त्यासाठी रस्त्यावर उतरायलं हवं. लोकांच्या हिताची गोष्ट असेल तर ती डोकी फोडून का सांगताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाला विचारला आहे.  

...मग डोकी काय फोडताय? रिफायनरीसाठी बारसूतील जागा होय मी सुचवली पण अडीच वर्ष पोलीस यंत्रणेचा वापर करून तिथल्या लोकांवर अन्याय केला नाही. माझ्या निर्णयावर इतके प्रेम होते मग आरेच्या जागेचा निर्णय का बदलला? बुलेट ट्रेन कोणासाठी करताय? राज्याच्या मूळावर येणारे विषय मी अडवले होते आणि यापुढेही अडवेन. बारसू, नाणारबद्दल मी भूमिका मांडली ती तिथल्या स्थानिक लोकांची होती. पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प नको. रिफायनरी प्रकल्पाचं राज्यात कुठे स्वागत होत असेल तर तिथे जरूर लावा. बारसूची जागेचा प्राथमिक अहवाल आला. ती जागा मोकळी आहे. तेव्हा मी ती जागा सुचवली. लोकांच्या हिताची गोष्ट आहे मग ती डोकी फोडून का सांगताय? लोकांवर जोरजबरदस्ती करण्याची गरज काय? चांगले प्रकल्प आणा, आम्ही विकासाच्या आड येत नाही असंही स्पष्टीकरण ठाकरेंनी दिले. 

लोकांच्या मनातील संशय दूर करा एअरबस, वेदांता हे प्रकल्प राज्यात का आणले नाहीत? चांगले प्रकल्प असतील ते इतर राज्यात पाठवले. रिफायनरी प्रकल्पाबाबत सत्य काय हे लोकांना कळाले पाहिजे. ग्रीन रिफायनरी असेल तर मारझोड कशाला करतायेत? तुमच्यात आत्मविश्वास असेल तर जनतेसमोर जावे. सध्या मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात फिरतायेत आणि तिकडे लोक रस्त्यावर उतरलेत. कोकणात आम्ही पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला मग त्यात पुढे का काही करत नाही? राज्यात उद्योगधंदे आहेत म्हणून राज्य वर आलंय. कष्टकरी, कामगार राज्यात आहेत. प्रकल्प लोकांना दाखवा, लोकांच्या मनातील संशय दूर करा. रोजगार उपलब्ध होणार असेल तर तो कायमस्वरुपी मिळणार आहे की नाही ते सांगा असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

दलालांना पैसे मिळणार, सरकार दडपशाही करणारएखादा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर जमीन भूसंपादित करायची असते. तेव्हा मूळ मालक असतो त्याला किंमत द्यावी लागते. रिफायनरी आणखी कुठे लागलीय तिथे लोकांना न्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं असेल तर ते दाखवा. लोकांना चिरडून, कुणाच्यातरी सुपारी घेऊन प्रकल्प लादतायेत. मूळ मालक वेगळेच झालेत. दलालांनी जागा विकत घेतल्या. त्या लोकांना नुकसान भरपाई मिळणार. सरकार दडपशाही करणार असा आरोप ठाकरेंनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा