शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

शेतकरी कायदे मागे घेण्याची मागणी असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 17:56 IST

शेतकरी नेते आंदोलन भडकवत आहेत

पिंपरी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच शेतकरी कायदे आणले आहेत. शेतकऱ्यांना कायदा माहीत नाही. शेतकरी नेतेच आंदोलन भडकावत आहेत. संपूर्ण कायदा मागे घेण्याची मागणी असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी आहे, अशा प्रकारची मागणी प्रथमच होत असल्याचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

शेतकरी आंदोलन मागे घेणे आवश्यक आहे. शेतकरी कायद्याबाबत काही शंका असतील, तर त्या दूर केल्या जातील. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना धक्का लागणार नाही. त्यांची शेत जमीन बळकावली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी बारा बैठका घेतल्या. मात्र, शेतकरी नेते ऐकण्यास तयार नाहीत. हे आंदेलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे नाही. पंजाब-हरियाणातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहे. त्यांना कायद्याची माहिती नाही. नेतेच त्यांना भडकावत आहे. कायद्यात बदल होऊ शकतात. मात्र, कायदाच मागे घेण्याची मागणी शेतकरी नेते करीत आहे. ही मागणी असंवैधानिक आणि लोकशाही विरोधी आहे. प्रथमच अशा प्रकारची मागणी होत असल्याचे आठवले म्हणाले.

नामांतरासाठी आम्ही सतरा वर्षे आंदोलन केले. मात्र, अशी अडवणुुकीची भूमिका घेतली नाही. लोकांना त्रास होईल असे वागलो नाही. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनावरुन जे सुरु आहे, त्याला जबाबदार कोण असा सवालही आठवले यांनी उपस्थित केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता कांबळे, परशूराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे या वेळी उपस्थित होते.---------------

आंदोलनजीवी नव्हे, शेतकऱ्यांना भडकवणारेभूमीहीन कुटुंबांसाठी आठवले यांनी आंदोलन जाहीर केले. मात्र, पंतप्रधान आंदोलनजीवी म्हणून शेतकरी आंदोलनाला संबोधत असल्याची आठवण पत्रकारांनी करुन दिल्यावर आठवले म्हणाले, त्यांना शेतकरी आंदलकांना भडकवणाऱ्या लोकांबाबत बोलायचे होते.---मराठ्यांसह देशातील क्षत्रिय, सवर्णांच्या आरक्षणास पाठिंबामराठा, राजपूत, जाट, ठाकूर, ब्राम्हण अशा सर्वच क्षत्रिय आणि सवर्णांना आरक्षण मिळाले पाहिजे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या खाली असेल त्यांना आरक्षण दिले जावे. नोकरी, शिक्षणात दहा ते बारा टक्के वाटा द्यावा. त्यांच्या आरक्षणाचा भार ओबीसींवर टाकू नये, असे आठवले म्हणाले.---येत्या २५ फेब्रुवारीपासून भूमीमुक्ती आंदोलनदेशात २५ फेब्रुवारीपासून भूमीमुक्ती आंदोलन सुरु करण्यात येईल. ज्या कुटुंबाकडे जमीन नाही, त्यांना पाच एकर भूखंड द्यावा अशी भूमिका आहे. देशात २० कोटी एकर पड जमीन आहे. त्याचा फायदा तीस ते पस्तीस कोटी लोकसंख्येला होईल.---जातीनिहाय जनगणना व्हावीदेशात होणार असलेली जनगणना जातीच्या आधारावर केली जावी. त्यामुळे प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व कळेल. सध्या शेड्युल्ड कास्ट आणि ट्राईब (एससी-एसटी) यांचे लोकसंख्येतील प्रमाण आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmer strikeशेतकरी संपRamdas Athawaleरामदास आठवलेFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार