माकपात नेतृत्व बदलाची मागणी
By Admin | Updated: June 3, 2014 22:52 IST2014-06-03T22:52:13+5:302014-06-03T22:52:13+5:30
लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अभूतपूर्व पराभवानंतर माकपात नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला आह़े

माकपात नेतृत्व बदलाची मागणी
>कोलकाता : लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अभूतपूर्व पराभवानंतर माकपात नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला आह़े येथे सुरू असलेल्या राज्य कमिटीच्या बैठकीत नेतृत्वबदलाचे सूर उमटू लागले असून, पक्षाचे महासचिव प्रकाश करात यांच्यावर ‘निष्क्रियतेचा’ ठपका ठेवण्यात आला आह़े
माकपाने आपल्या 6क् दशकांच्या निवडणुकींच्या इतिहासात आजर्पयतचे सर्वाधिक खराब प्रदर्शन केले आह़े त्यामुळेच गत काही दिवसांपासून पक्षातील ‘निष्क्रिय’ नेतृत्व बदलण्याच्या मागणीने जोर धरला आह़े 2 जून रोजी सुरू झालेल्या पक्षाच्या दोनदिवसीय राज्य कमिटीच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटल़े विविध जिल्हय़ांच्या राज्य कमिटीच्या नेत्यांनी करात, राज्य सचिव बिमान बोस, पॉलिट ब्युरो सदस्य व माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा नामोल्लेख टाळत नेतृत्वावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केल़े या बैठकीला करात यांच्यासह त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार तसेच पॉलिट ब्युरो सदस्य सीताराम येचुरी हेही उपस्थित होत़े पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर 2क्11 मध्ये माकपाला ती गमवावी लागली होती़ तृणमूल काँग्रेसने माकपाच्या हातून सत्ता हिसकावली होती़ लोकसभा निवडणुकीतही राज्यातील 42 जागांपैकी माकपाच्या झोळीत केवळ दोन जागा पडल्या़ 2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत माकपाने 9 जागा जिंकल्या होत्या़ (वृत्तसंस्था)
राज्य कमिटीच्या एका नेत्याने सांगितले की, निवडणुकीच्या ठीक आधी प्रादेशिक पक्षांसोबत तिसरी आघाडी बनविणो लोकांच्या पचनी पडले नाही़ पक्षनेतृत्वाचा हा निर्णय जनतेच्या पसंतीत उतरला नाही़ त्याचा निवडणुकीत फटका बसला.
4एका अन्य नेत्यानेही पक्षनेतृत्वावर तोफ डागली़ लोकसभा प्रचारादरम्यान तृणमूल काँग्रेसप्रमुख ममता बॅनर्जी आणि भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्यातील वाक्युद्धामुळे राज्यात धुव्रीकरण झाले; पण पक्ष नेतृत्व ते समजू शकले नाही़
पक्ष नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वत:वर न घेता ती सामूहिक असल्याचे सांगितल़े यावरही अनेक नेत्यांनी टीका केली़