शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

संपूर्ण कर्जमाफीची विरोधकांची मागणी

By admin | Updated: April 28, 2016 05:52 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी आज केली

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १२७२ कोटी रुपयांच्या व्याजमाफीची सरकारने केलेली घोषणा फसवी असल्याची टीका करून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी आज केली. राज्य सरकारने ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करून २१ लाख शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावाही शुद्ध धूळफेक असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्र परिषदेत केली. १२७२ कोटींच्या कथित व्याजमाफीपोटी शासनाला यंदा एकही पैसा द्यावा लागणार नाही. त्या नंतरच्या चार वर्षांचे कर्ज व त्यावरील व्याज आताच अंदाजित करून फुगवलेला आकडा सरकारने दिला आहे. आतापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजमाफी ऐकली होती, पण जे कर्ज अजून घेतलेलेच नाही, त्यावर माफी कशी, असा सवाल सावंत यांनी केला. शेतकऱ्यांबद्दल सरकारची नियत साफ असेल, तर संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळ निवारणासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. दुष्काळग्रस्त भागात आणखी चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, या भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण शुल्क माफ करावे, आगामी खरीप हंगामासाठी बी-बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावीत, दोन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने द्याव्यात, दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या निवास, भोजन व रोजगाराची सोय करावी, मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा पाणीपुरवठा १०० टक्के बंद करावा, बाटलीबंद पाण्याचे उद्योग ताब्यात घेऊन सरकारने तेथून पाणीपुरवठा करावा, आदी मागण्या केल्याचे तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते. ...तर स्थलांतर झाले नसते१माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पुणे व इतर भागातही चारा छावण्यांची मागणी होत आहे, पण त्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे स्थलांतर वाढत आहे. दुष्काळी भागात टँकर देताना जनावरांचा विचार केला जात नाही. २मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अजूनही पिण्याचे पाणी नाही. रोजगार हमीच्या कामांचे नियोजन नाही. त्यामुळे शेल्फवर एक लाख कामे आहेत आणि प्रत्यक्षात सहा हजारच कामे देण्यात आली आहेत. नाला सरळीकरण, खोलीकरणाची कामे मशिनद्वारे केली जात आहे. ती रोहयोतून केली असती, तर स्थलांतर झाले नसते.