शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

संपूर्ण कर्जमाफीची विरोधकांची मागणी

By admin | Updated: April 28, 2016 05:52 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी आज केली

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १२७२ कोटी रुपयांच्या व्याजमाफीची सरकारने केलेली घोषणा फसवी असल्याची टीका करून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी आज केली. राज्य सरकारने ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करून २१ लाख शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावाही शुद्ध धूळफेक असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्र परिषदेत केली. १२७२ कोटींच्या कथित व्याजमाफीपोटी शासनाला यंदा एकही पैसा द्यावा लागणार नाही. त्या नंतरच्या चार वर्षांचे कर्ज व त्यावरील व्याज आताच अंदाजित करून फुगवलेला आकडा सरकारने दिला आहे. आतापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजमाफी ऐकली होती, पण जे कर्ज अजून घेतलेलेच नाही, त्यावर माफी कशी, असा सवाल सावंत यांनी केला. शेतकऱ्यांबद्दल सरकारची नियत साफ असेल, तर संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळ निवारणासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. दुष्काळग्रस्त भागात आणखी चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, या भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण शुल्क माफ करावे, आगामी खरीप हंगामासाठी बी-बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावीत, दोन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने द्याव्यात, दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या निवास, भोजन व रोजगाराची सोय करावी, मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा पाणीपुरवठा १०० टक्के बंद करावा, बाटलीबंद पाण्याचे उद्योग ताब्यात घेऊन सरकारने तेथून पाणीपुरवठा करावा, आदी मागण्या केल्याचे तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते. ...तर स्थलांतर झाले नसते१माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पुणे व इतर भागातही चारा छावण्यांची मागणी होत आहे, पण त्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे स्थलांतर वाढत आहे. दुष्काळी भागात टँकर देताना जनावरांचा विचार केला जात नाही. २मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अजूनही पिण्याचे पाणी नाही. रोजगार हमीच्या कामांचे नियोजन नाही. त्यामुळे शेल्फवर एक लाख कामे आहेत आणि प्रत्यक्षात सहा हजारच कामे देण्यात आली आहेत. नाला सरळीकरण, खोलीकरणाची कामे मशिनद्वारे केली जात आहे. ती रोहयोतून केली असती, तर स्थलांतर झाले नसते.