शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Oil Refinery: रत्नागिरीत नव्हे, तर विदर्भात रिफायनरी उभारण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 08:55 IST

Oil Refinery News: रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स नाणारऐवजी आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव येथे उभारण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले. त्यामुळे विदर्भातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नागपूर : रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स नाणारऐवजी आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव येथे उभारण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले. त्यामुळे विदर्भातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकल्प रत्नागिरीऐवजी विदर्भात उभारावा, असे स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांचे मत आहे.

या प्रकल्पाचे अनेक फायदे असून, या भागातील ५०० पेक्षा जास्त लघू व मध्यम उद्योगांची भरभराट अणि नवसंजीवनी मिळणार असल्याचे उद्योजकांचे मत आहे. शिवाय नवे उद्योग उभे राहतील. या संदर्भात रविवारी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या नेतृत्वात झालेल्या पत्रपरिषदेत विदर्भात बहुतांश औद्योगिक आणि व्यावसायिक संघटनांनी हा प्रकल्प विदर्भात उभारण्यावर भर दिला.

‘वेद’चे अध्यक्ष शिवकुमार राव आणि उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी म्हणाले, प्रकल्प विदर्भात आल्यास त्यापासून तयार उत्पादनाच्या वाहतुकीला कमी खर्च येईल. यासह या प्रकल्पाशी जुळलेले प्रकल्प विदर्भात येतील. या प्रकल्पामुळे विदर्भात चार लाखांपेक्षा जास्तची गुंतवणूक येईल आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल.

माहेश्वरी म्हणाले, देशात रिफायनरी समुद्री भागासह जमिनी भागातही आहेत. समृद्धी महामार्गाला समांतर कच्च्या तेलाची पाईपलाईन टाकता येईल. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्ये इंधन स्वस्त मिळेल.पत्रपरिषदेत रिफायनरी क्षेत्रातील तज्ज्ञ विनायक मराठे, बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, व्हीआयएचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुधे, एमआयएचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, कोसिया विदर्भाचे अध्यक्ष सीए जुल्फेश शाह, व्हीपीआयएचे अध्यक्ष राकेश सुराना, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पkonkanकोकणVidarbhaविदर्भ