शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

Oil Refinery: रत्नागिरीत नव्हे, तर विदर्भात रिफायनरी उभारण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 08:55 IST

Oil Refinery News: रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स नाणारऐवजी आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव येथे उभारण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले. त्यामुळे विदर्भातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नागपूर : रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स नाणारऐवजी आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव येथे उभारण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले. त्यामुळे विदर्भातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकल्प रत्नागिरीऐवजी विदर्भात उभारावा, असे स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांचे मत आहे.

या प्रकल्पाचे अनेक फायदे असून, या भागातील ५०० पेक्षा जास्त लघू व मध्यम उद्योगांची भरभराट अणि नवसंजीवनी मिळणार असल्याचे उद्योजकांचे मत आहे. शिवाय नवे उद्योग उभे राहतील. या संदर्भात रविवारी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या नेतृत्वात झालेल्या पत्रपरिषदेत विदर्भात बहुतांश औद्योगिक आणि व्यावसायिक संघटनांनी हा प्रकल्प विदर्भात उभारण्यावर भर दिला.

‘वेद’चे अध्यक्ष शिवकुमार राव आणि उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी म्हणाले, प्रकल्प विदर्भात आल्यास त्यापासून तयार उत्पादनाच्या वाहतुकीला कमी खर्च येईल. यासह या प्रकल्पाशी जुळलेले प्रकल्प विदर्भात येतील. या प्रकल्पामुळे विदर्भात चार लाखांपेक्षा जास्तची गुंतवणूक येईल आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल.

माहेश्वरी म्हणाले, देशात रिफायनरी समुद्री भागासह जमिनी भागातही आहेत. समृद्धी महामार्गाला समांतर कच्च्या तेलाची पाईपलाईन टाकता येईल. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्ये इंधन स्वस्त मिळेल.पत्रपरिषदेत रिफायनरी क्षेत्रातील तज्ज्ञ विनायक मराठे, बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, व्हीआयएचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुधे, एमआयएचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, कोसिया विदर्भाचे अध्यक्ष सीए जुल्फेश शाह, व्हीपीआयएचे अध्यक्ष राकेश सुराना, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पkonkanकोकणVidarbhaविदर्भ