शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मीरा भाईंदरमधील टीडीआर प्रकरणांची सीआयडी चौकशीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 13:57 IST

मीरा भाईंदर शहरातील आरक्षणांच्या बदल्यात विकास हक्क प्रमाणपत्र अर्थात टीडीआर देतेवेळी मोठ्या प्रमाणावर अनियमितता, भ्रष्टाचार होऊन पालिकेचे देखील कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगत नगरसेवक अनिल सावंत यांनी बुधवारच्या (28 मार्च) महासभेत नियम 'ज' चा प्रस्ताव आणला आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील आरक्षणांच्या बदल्यात विकास हक्क प्रमाणपत्र अर्थात टीडीआर देतेवेळी मोठ्या प्रमाणावर अनियमितता, भ्रष्टाचार होऊन पालिकेचे देखील कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगत नगरसेवक अनिल सावंत यांनी बुधवारच्या (28 मार्च) महासभेत नियम 'ज' चा प्रस्ताव आणला आहे. या टीडीआर प्रकरणाची सावंत यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. तर वादाच्या भोवऱ्यात आलेल्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन या एकाच कंपनीला मोठ्या प्रमाणात टीडीआर देण्यात आल्याचे सांगत ही कंपनी भाजपाच्या लोकप्रतिनिधीशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

बुधवार 28 मार्चच्या महासभेमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल सावंत यांनी हा प्रस्ताव आणला आहे. मनपाचा विकास आराखडा १९९७ साली बनविण्यास सुरुवात झाली. त्याला २००० साली मान्यता मिळाली व तो अस्तित्वात आला. पुढील २० वर्षात शहराची लोकसंख्या साधारण ७.५० ते ८ लाख असेल असे विचारात घेऊन आराखडा बनविण्यात आला. कारण एवढीच लोकसंख्या हे शहर सहन करू शकते या शहराचे क्षेत्रफळ आहे ७९ चौ.मी.त्यावेळी ३८६ आरक्षणे ठेवण्यात आली. त्यापैकी ३१५ खासगी जागेवर, २० मीठ विभागाच्या, ११ शासकीय जागेवर व १३ समावेशक आरक्षण असा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय जागां मधील नुकत्याच हस्तांतरित केलेल्या आरक्षणांपैकी ७ आरक्षणं ही सीआरझेड बाधित आहेत . 

आरक्षणातील ७७ खेळाचे मैदान व बगीचा या आरक्षणांना ३०६ वेळा लाखो चौ.मी.टीडीआर या आरक्षणांच्या बदल्यात देण्यात आला. विषेश म्हणजे यातील बहुतांश टीडीआर हा सेव्हन इलेव्हन कंपनीच्या नावे देण्यात आलेला आहे. एवढे बगीचे व खेळाची मैदाने विकसित झाली असती तर या शहराचे स्वरूप कसे दिसले असते. 

आज शहरातील जनता या सोयीसुविधा पासून वंचित राहिलेली आहे. नवीन विकास आराखड्यात ताब्यात न आलेल्या आरक्षणावरील आरक्षण हटविण्यात येईल, अशी रास्त भीती जनतेच्या मनात आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आरक्षण क्र.१२२ एकूण आरक्षण ४६७०० चौ.मी. असून ताब्यात आलेले क्षेत्र ३५१८२.५ चौ.मी. असताना टीडीआर मात्र ५७४७८.२९ चौ. मी. दिलेला आहे. पण त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. टीडीआर म्हणजे बेरर चेकच्या खिरापतीसारखा वाटण्यात आलेला आहे. टीडीआर देतेवेळी त्याच्या बदल्यात मातीभराव करण्याची व कुंपण भिंत बांधण्याची रक्कम मनपाला द्यावी लागते. ७/१२ पालिकेच्या नावावर करावा लागतो. परंतु हे सर्व संकेत पायदळी तुडविण्यात आलेले आहेत. आज पर्यंत मातीभराव व कुंपण भिंत याची ५ कोटी रक्कम मनपाकडे जमा झाली. या जमा झालेल्या रकमेत किती घनफूट भिंत बांधली ? किती माती भाराव टाकला ? टीडीआरच्या बदल्यात पूर्ण रक्कम आली का ? किंवा आरक्षण ताब्यात घेतेवेळी कुंपण भिंत बांधली आहे का ?माती भराव केला आहे का? अतिक्रमण नाही ना ? याची कोणतीही खातरजमा मनपाने केलेली दिसत नाही असा आरोप सावंत यांनी केलाय. 

याची माहिती वारंवार मागूनही संबंधित विभाग ती देत नाही. अतिक्रमण विरोधी विभागाकडे मनपाच्या ताब्यातील आरक्षणांवर झालेल्या अतिक्रमणांची माहितीच नाही तर कारवाई कुठून करणार  महासभा व स्थायी समिती मध्ये वेळोवेळी हि आरक्षणे विकसित करण्याचे ठराव झाले. सामाजिक संस्थांना विकसित करण्यासाठी देण्याचे ठरविण्यात आले त्यांच्याजवळून देकार घेण्यात आले परंतु १००% आरक्षण ताब्यात आले नाही म्हणून देकार परत करण्यात आले. परंतु मागील महासभेत मात्र ३०% जरी आरक्षण ताब्यात असेल तरी शालेय संस्थांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला या वरून आरक्षण वाटपात देखील भ्रष्टाचाराचा संशय आहे. अतिक्रमण होण्यासाठी मनपाच प्रोत्साहन देते कि काय अशी दाट शंका सावंत यांनी व्यक्त केली आहे . 

मैदान व बगीचा ताब्यात न घेतलेली आरक्षणे ताब्यात घेण्याची कार्यवाही त्वरित करावी, झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे, या मध्ये दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी व दिलेल्या टीडीआर ची सीआयडी चौकशीची मागणी अनिल सावंत यांनी केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर