शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

सामनावर बंदीची मागणी चुकीची - व्यंकय्या नायडूंचा पक्षाला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 11:25 AM

सामना पेपरवर बंदी घालण्याची भाजपा कार्यकऱ्यांकडून करण्यात आलेली मागणी चुकीची असून पेपरवर बंदी घालू नये, अशा शब्दांत वैकंय्या नायडू यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे प्रकाशन तीन दिवस थांबविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. ' मात्र ही मागणी  चुकीची असून पेपरवर बंदी घालू नये' असे सांगत केंद्रीय नगरविकास मंत्री वैकंय्या नायडू यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला.  ' सामना पेपरवर बंदी घालण्याची भाजपा कार्यकऱ्यांकडून करण्यात आलेली मागणी चुकीची असून  पेपरवर बंदी घालू नये. त्यांना मोदींविरोधात जे लिहायचे ते लिहू द्यावे, अखेर जनता निर्णय घेईल' असे नायडू यांनी  म्हटले.
राज्यात सुरु असलेल्या महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामना पेपरवर ३ दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर नायडू यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली. भाजप व शिवसेना राज्यात एकत्र सत्तेवर असताना महापालिका निवडणूक प्रचारामध्ये एकमेकांविरोधात अयोग्य भाषेत टीका करणेही चुकीचे असल्याचे नायडू यांनी यावेळी स्पष्ट केले.
(‘सामना’चे प्रकाशन थांबविण्यास नकार)
(‘सामना’वर बंदी ही लोकशाहीची हत्या - मलिक)
 
भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र देऊन १६ तसेच २० आणि २१ फेब्रुवारी रोजी सामना प्रकाशित करण्यास बंदी आणावी अशी मागणी केली होती. ‘सामना’मध्ये शिवसेनेचा राजकीय फायदा होईल असा मजकूर छापला जात आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून त्या बद्दल शिवसेना, सामनाचे संपादक यांच्यावर कारवाई करावी, संपूर्ण निवडणूक प्रचारकाळात सामनामध्ये छापलेला प्रचारकी मजकूर हा जाहिरातीचा भाग असल्याने तो शिवसेनेने निवडणूक खर्चात जोडलेला आहे की नाही याची चौकशी करावी आणि जोडलेला नसेल तर तो पेड न्यूज समजण्यात यावा, अशा तीन मागण्या श्वेता शालिनी यांनी निवेदनात केल्या होत्या. 
मात्र हा प्रकार म्हणजे माध्यमांवर बंधने घालून भाजपा लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली होती. ' : भाजपाकडून सरकारविरोधी बातम्या देणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी एका वाहिनीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. आता सामना पेपरवर बंदी घालण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपावर टीकास्त्र सोडले.