शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

भाजपाने जिजाऊ-शिवरायांच्या स्वप्नाचा चुराडा केला, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 4:01 PM

शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार.

सिंदखेड राजा (बुलडाणा) : शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार. त्यांना फक्त मलाई खायला पाहिजे, अशा शब्दात आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी येथे भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली.

राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ४२० व्या जन्मोत्सवाच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाच्या वतीने मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. जातीयवादाच्या राजकारणामुळे आज महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. सध्याच्या भाजप सरकराने हेच केले असून माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रिबाई फुले आणि महात्मा फुले यांची स्वप्ने शाळा बंद करून त्यांचा भंग केला आहे, असे केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले. तीन वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तेथे शाळांचा कायापालट आम्ही केला असून ३०० नवीन शाळा निर्माण केल्या आहेत. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये स्वीमिंग पूल, जिम, हाँकी मैदाने निर्माण केली आहेत. अन्य शाळांच्या तुलनेत दहा टक्के  निकालही या सुविधांमुळे वाढला आहे. ख-या अर्थाने आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण केले असल्याचा दावा त्यांनी केला. ४० हजार करोडचे बजेट दिल्ली सरकारचे आहे. ते जर सरकारी शाळा चालवू शकते तर तीन लाख करोडचे बजेट असलेल्या महाराष्ट्राला सरकारी शाळा चालवणे का जमू नये. कारण त्यांना पैसा खायचा आहे. महाराष्ट्रात सध्या घोटाळे समोर येत आहेत. दिल्लीत जनतेने अर्थात रयतेने काँग्रेस, भाजपलाही सत्तेतून दूर हाकलून सामान्य मानसाचे अरथात आम आदमीची सत्ता प्रस्तापीत केली. त्यामुळेच मोफत आरोग्य सुविधा, देशात सर्वात स्वस्त वीज दिल्लीमध्ये उपलब्ध करून देऊ शकलो असेही केजरीवाल म्हणाले.

भाजप हा दंगेखोरांचा पक्ष-भारतीय जनता पक्ष हा दंगेखोरांचा पक्ष आहे. देशद्रोही, गद्दारांचा या पक्षात समावेश आहे. पाकिस्तान गत ७० वर्षांपासून भारतात अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्या देशाला जे ७० वर्षांत जमले नाही, ते भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात करून दाखविले. या सरकारच्या काळात देशात अराजकता माजली असून, जातीय दंगली वाढल्या आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. कोरेगाव भीमा येथील घटनेचा संदर्भ देताना ‘जातीय दंगली घडवा आणि राज्य करा’ हेच धोरण या सरकारचे असल्याची टीका केजरीवाल यांनी केली. यावेळी त्यांनी कोरेगाव भीमा घटनेचा जाहीर निषेधही केला.

या कार्यक्रमास दिल्लीचे मंत्री राजेंद्र गौतम, आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शरमा मेनन, सिंचन घोटाळा काढणारे विजय पांढरे, राहूल चव्हाण, देवेंद्र वानखेडे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, बुलडाणा जिल्हा प्रभारी संयोजक सुनील मोरे, लक्ष्मण कोल्हे, अनिल पटेल, अजिंक्य शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालbuldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाBJPभाजपा