शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आरक्षण मिळण्यास उशीर; बच्चू कडू यांचा सरकारलाही घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 18:27 IST

आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचं विधान केलं आहे. 

आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. परंतु, सरकार खोट्या केसेस दाखल करीत आहे. केसेसला घाबरून आरक्षणाच्या लढ्यातून मागे सरकू नये. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. 

सरकारने वातावरण दूषित करू नये. आता माझे बोलणे कधी बंद होईल, हेच मला माहिती नाही. त्यामुळे शासनाने वेळ कशासाठी हवा, किती हवा, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का हे इथं येवून सांगावे. आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले होते. आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं आहे. याचदरम्यान आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचं विधान केलं आहे. 

अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आरक्षण मिळण्यास उशीर झाला आहे, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. मराठा नक्षलवादी नाहीत, त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. प्रमाणपत्र देण्यात अधिकाऱ्यांनी घोळ केला आहे. मराठा हा कुणबी आहे व त्याचे काम हे कुणबीचेच आहे. कुणबी म्हणून जर त्यांनी प्रमाणपत्र देत नसतील तर मराठा कोण आहे हे सरकारने  सांगावे, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मंत्रालयात सर्वपक्षीय आमदारांचे आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईत आमदारांनीही आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी मराठा समाजातील आमदारांनी मंत्रालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा मंत्रालय परिसरात आमदारांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी या आमदारांना ताब्यात घेतले. याठिकाणी आमदार रोहित पवार म्हणाले की, सत्ताधारी-विरोधी आमदार मराठा समाजाला न्याय मिळावा, जरांगे पाटील यांच्या काळजीपोटी सर्वच आंदोलन करतायेत. प्रत्येकजण आपापल्या परीने आंदोलन करत आहेत. सत्ताधारी आमदार आंदोलन करत आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु ते प्रयत्न करत आहेत. सरकारने लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून मनोज जरांगेंशी चर्चा करावी. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे ते उपोषण मागे घेतील यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBacchu Kaduबच्चू कडूMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार