शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

‘औद्योगिक’ गुंतवणुकीत घट, घोषणा ११ लाख कोटींची, गुंतवणूक एक लाख ९० हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:24 IST

राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असले तरी प्रत्यक्षात या क्षेत्रातील गुंतवणुकीत बरीच घट झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

- राजेश निस्तानेयवतमाळ : राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असले तरी प्रत्यक्षात या क्षेत्रातील गुंतवणुकीत बरीच घट झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात सुमारे ११ लाख ३७ हजार ७८३ कोटींची गुंतवणूक होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत ही गुंतवणूक अवघ्या दोन लाख ६९ हजार ८१० कोटींवर पोहोचली आहे. भाजपा सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्योगांच्या संख्येत सुमारे साडेपाचशेने घट झाली आहे. गुंतवणुकीचे प्रमाण साडेसात टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांवर आले आहे.‘मेक इन इंडिया’ सप्ताहादरम्यान उद्योग खात्याशी संबंधित एकूण दोन हजार ८५० सामंजस्य करार झाले. त्यातून चार लाख १३ हजार कोटींची गुंतवणूक सरकारला अपेक्षित होती. परंतु सामंजस्य करारापैकी आतापर्यंत दोन हजार ४५६ करारांचीच प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली असून त्याद्वारे एक लाख ९० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. नोटाबंदी, जीएसटीनंतर ही गुंतवणूक घटल्याचे मानले जाते.उद्योगांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनानवनवीन उद्योग यावेत, त्यातून गुंतवणूक वाढावी यासाठी विविध योजना राबवून उद्योगांना आकर्षित केले जात आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व फॅब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विशेष प्रोत्साहन योजना व महिला उद्योजकांसाठी धोरणे जाहीर केली आहेत. त्या माध्यमातून उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. विविध सुधारणा, एक खिडकी प्रणालीद्वारे उद्योगांना ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस’ उपक्रमात समाविष्ट केले जात आहे. मात्र त्यानंतरही नव्या उद्योगांची उभारणी व गुंतवणुकीला अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र