शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

15 डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्तीचे आव्हान, 56000 किमी रस्त्यांवर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 03:24 IST

राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी, खड्डेमुक्तीचे हे आव्हान सोपे नाही.

राजेश निस्ताने ।यवतमाळ : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी, खड्डेमुक्तीचे हे आव्हान सोपे नाही. सां.बा. खात्याच्या अखत्यारीत येणाºया ९० हजार किलोमीटर रस्त्यांपैकी तब्बल ५६ हजार किलोमीटर रस्त्यांवर खड्डे पडले असल्याची माहिती या खात्यानेच केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आहे.रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांवरून विरोधकांनी सरकारला टिकेचे लक्ष्य केल्यानंतर सा.बां. मंत्री पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त होईल, अशी घोषणा केली. जिल्हानिहाय बैठका घेऊन त्यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. मंत्रालयात स्थापन केलेल्या वॉररुममधून खड्डेमुक्तीच्या मिशनवर लक्ष ठेवले जात आहे. हे करत असतानाच, ‘खड्डे पडले म्हणून आभाळ कोसळले का?’ असे वक्तव्य करून चंद्रकांतदादांनी विरोधकांच्या हाती आयते कोलित दिले. राष्टÑवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर ‘सेल्फी विथ खड्डे’ अशी मोहीम चालविली.खड्डे बुजविण्यात मराठवाडा मागे-सार्वजनिक बांधकाम खात्याने आतापर्यंत सर्वाधिक ३०.२२ टक्के खड्डे मुंबई परिमंडळात तर सर्वात कमी ७.९० टक्के खड्डे मराठवाड्यात अर्थात औरंगाबाद परिमंडळात बुजविले आहेत. पुणे २५.४३, नाशिक २७.३४, अमरावती १०.४८ तर नागपूर विभागातील २२.२२ टक्के खड्डे बुजविण्यात आले.राज्यातील अर्ध्याहून अधिक रस्ते खड्ड्यांचेच आहेत..राज्यातील ३७ हजार ७०० किलोमीटरचे राज्यमार्ग आणि ५२ हजार १७२ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ८९ हजार ८७२ किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली येतात. या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याची ओरड जनतेतून होत आहे. म्हणून बांधकाम खात्याने नेमके खड्डे कुठे व किती याचे सर्वेक्षण केले.तेव्हा ८९ हजार किलोमीटर पैकी तब्बल ५६ हजार १६० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर खड्डे आढळून आले. तसा अहवाल बांधकाम मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये खड्डे असलेल्या राज्य मार्गांची लांबी २३ हजार ३७४ किलोमीटर तर प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी ३२ हजार ७८६ किलोमीटर आहे.अमरावती विभागाला हवे ६० कोटी -अमरावती महसूल विभागात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असे सुमारे १२ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. यापैकी राज्य मार्गावर तीन हजार ११७ तर प्रमुख जिल्हा मार्गावर दोन हजार ९१६ किलोमीटर क्षेत्रात खड्डे आहेत. आतापर्यंत राज्य मार्गावरील ४६२ किलोमीटर अर्थात १४.८५ टक्के तर प्रमुख जिल्हा मार्गावरील १६९ किलोमीटर अर्थात ५.८२ टक्के खड्डे बुजविले गेले आहेत. अमरावती विभागात आतापर्यंत १०.४८ टक्के खड्डे बुजविले गेले आहे.त्यामध्ये अमरावती १४.८२, यवतमाळ ६०.१६, अकोला ११.७९, वाशिम ७.११ तर बुलडाणा जिल्ह्यातील १३.२२ टक्के खड्डे बुजविले गेले आहे. सहा हजार किमीवरील खड्डे बुजविण्यासाठी किमान ६० कोटी लागणार आहेत.

टॅग्स :Potholeखड्डेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार