शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

15 डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्तीचे आव्हान, 56000 किमी रस्त्यांवर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 03:24 IST

राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी, खड्डेमुक्तीचे हे आव्हान सोपे नाही.

राजेश निस्ताने ।यवतमाळ : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी, खड्डेमुक्तीचे हे आव्हान सोपे नाही. सां.बा. खात्याच्या अखत्यारीत येणाºया ९० हजार किलोमीटर रस्त्यांपैकी तब्बल ५६ हजार किलोमीटर रस्त्यांवर खड्डे पडले असल्याची माहिती या खात्यानेच केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आहे.रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांवरून विरोधकांनी सरकारला टिकेचे लक्ष्य केल्यानंतर सा.बां. मंत्री पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त होईल, अशी घोषणा केली. जिल्हानिहाय बैठका घेऊन त्यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. मंत्रालयात स्थापन केलेल्या वॉररुममधून खड्डेमुक्तीच्या मिशनवर लक्ष ठेवले जात आहे. हे करत असतानाच, ‘खड्डे पडले म्हणून आभाळ कोसळले का?’ असे वक्तव्य करून चंद्रकांतदादांनी विरोधकांच्या हाती आयते कोलित दिले. राष्टÑवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर ‘सेल्फी विथ खड्डे’ अशी मोहीम चालविली.खड्डे बुजविण्यात मराठवाडा मागे-सार्वजनिक बांधकाम खात्याने आतापर्यंत सर्वाधिक ३०.२२ टक्के खड्डे मुंबई परिमंडळात तर सर्वात कमी ७.९० टक्के खड्डे मराठवाड्यात अर्थात औरंगाबाद परिमंडळात बुजविले आहेत. पुणे २५.४३, नाशिक २७.३४, अमरावती १०.४८ तर नागपूर विभागातील २२.२२ टक्के खड्डे बुजविण्यात आले.राज्यातील अर्ध्याहून अधिक रस्ते खड्ड्यांचेच आहेत..राज्यातील ३७ हजार ७०० किलोमीटरचे राज्यमार्ग आणि ५२ हजार १७२ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ८९ हजार ८७२ किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली येतात. या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याची ओरड जनतेतून होत आहे. म्हणून बांधकाम खात्याने नेमके खड्डे कुठे व किती याचे सर्वेक्षण केले.तेव्हा ८९ हजार किलोमीटर पैकी तब्बल ५६ हजार १६० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर खड्डे आढळून आले. तसा अहवाल बांधकाम मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये खड्डे असलेल्या राज्य मार्गांची लांबी २३ हजार ३७४ किलोमीटर तर प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी ३२ हजार ७८६ किलोमीटर आहे.अमरावती विभागाला हवे ६० कोटी -अमरावती महसूल विभागात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असे सुमारे १२ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. यापैकी राज्य मार्गावर तीन हजार ११७ तर प्रमुख जिल्हा मार्गावर दोन हजार ९१६ किलोमीटर क्षेत्रात खड्डे आहेत. आतापर्यंत राज्य मार्गावरील ४६२ किलोमीटर अर्थात १४.८५ टक्के तर प्रमुख जिल्हा मार्गावरील १६९ किलोमीटर अर्थात ५.८२ टक्के खड्डे बुजविले गेले आहेत. अमरावती विभागात आतापर्यंत १०.४८ टक्के खड्डे बुजविले गेले आहे.त्यामध्ये अमरावती १४.८२, यवतमाळ ६०.१६, अकोला ११.७९, वाशिम ७.११ तर बुलडाणा जिल्ह्यातील १३.२२ टक्के खड्डे बुजविले गेले आहे. सहा हजार किमीवरील खड्डे बुजविण्यासाठी किमान ६० कोटी लागणार आहेत.

टॅग्स :Potholeखड्डेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार