शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 08:27 IST

राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं.

नागपूर - गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली. आगामी महापालिका निवडणुकांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. या चर्चेतून येत्या महापालिकांमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा वरिष्ठ नेत्यांनी ठाम निर्णय घेतला आहे. त्यात स्थानिक पातळीवर ४-५ नेत्यांच्या समन्वय समिती नेमली जाईल. मुंबई, ठाणे यासारख्या प्रमुख महापालिकांबाबत वरिष्ठ स्तरावर १०० टक्के महायुती करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. नागपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून सकारात्मकपणे पुढे गेले पाहिजे असा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक महापालिका निवडणुकीच्या स्तरावर ४-५ प्रमुख नेत्यांची समिती बनवली जाईल. ही समिती महायुतीबाबत प्राथमिक स्वरुपात चर्चा करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे. त्यात जनतेच्या हित याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. भविष्यातील लोकहित आणि विकासात्मक धोरणातून सकारात्मक संदेश खालच्या स्तरापर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्या त्या दृष्टीने ज्या ज्या शक्यता आहे त्याचा विचार महायुतीत करण्याचं काम वरिष्ठ पातळीवर करण्याचा निर्णय झाला आहे. महायुती म्हटलं तर त्यात सर्व घटक पक्ष शिंदेसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि इतरही पक्ष आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांची कमिटी तयार करून त्या त्या पातळीवर निर्णय घेण्याचे महायुतीत ठरले आहे असंही रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.

दरम्यान, सर्वच गोष्टीची चर्चा जाहीरपणे होणे अपेक्षित नाही. परंतु एक गोष्ट सकारात्मकपणे महायुतीबाबतीत निर्णय होणे हे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. २९ महापालिका आहेत, त्या त्याठिकाणी असलेली परिस्थिती रोज बदलत जाते. पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांची जी समिती बनवली आहेत ते जागावाटपाबाबत निर्णय प्रक्रियेची सुरुवात करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरवला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे प्रदीर्घ अनुभव असणारे नेते आहेत. हे तिघेही फार विचार करून महाराष्ट्राला आवश्यक काय आहे याचा विचार करून निर्णय घेत असतात. त्यामुळे यापुढेही ते निर्णय घेतील अशीही माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : MahaYuti to fight municipal elections together: Ravindra Chavan's big statement.

Web Summary : BJP leader Ravindra Chavan announced MahaYuti will contest municipal elections together. Committees will be formed at each level to discuss strategy. Senior leaders will make final decisions, prioritizing public welfare and development with a positive approach.
टॅग्स :MahayutiमहायुतीRavindra Chavanरविंद्र चव्हाणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकShiv Senaशिवसेना