शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय अद्याप नाहीच; विद्यार्थी, शिक्षणसंस्थांना सरकारी निर्णयाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 08:11 IST

५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, अद्याप राज्यातील महाविद्यालये निर्णयाच्या प्रतीक्षेतच आहेत.

मुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेऊन ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, अद्याप राज्यातील महाविद्यालये निर्णयाच्या प्रतीक्षेतच आहेत. महाविद्यालये कधी सुरू हाेणार, परीक्षांचे काय, याबाबत विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहेत.उदय सामंत यांनी मागील फेसबुक संवादात दिलेल्या माहितीनुसार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात येणार हाेता. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठेवून त्यावर चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र या संदर्भातील कोणताही आढावा अथवा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची किंवा मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक अद्याप झाली नसल्याचे समजते. याच कारणास्तव महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय बारगळल्याचे समोर आले आहे.अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच पारंपरिक महाविद्यालयांतील इतर प्रात्यक्षिकांसाठी तरी महाविद्यालये खुली करावीत, अशी निवेदने आणि पत्रे उच्च व तंत्रशिक्षण विभागाला शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांकडून पाठविली जात आहेत. महाविद्यालये सुरू न झाल्याने अनेक पारंपरिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रखडल्या आहेत.‘ऑनलाइन शिक्षण हा केवळ पर्याय’ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग हा शिक्षणाला पर्याय असला तरी पूरक व उपयुक्त नसल्याने अनेक फार्मसी, अभियंत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चरच्या व इतर पारंपरिक शाखांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने लवकरात लवकर सरकारची मंजुरी घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांकडून हाेत आहे.महिनाअखेरपर्यंत निर्णयउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय महिनाअखेरपर्यंत घेण्यात येईल, असे संकेते दिले आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीProfessorप्राध्यापकEducationशिक्षण