शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वर्षाच्या सुरुवातीलाच ३१ डिसेंबरची मुदत..! मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 07:07 IST

‘राष्ट्रीय महामार्ग - ६६ च्या (मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग) रुंदीकरणाचे व दुरुस्तीसह सर्व बाबींचे काम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करा. हे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचएआयच्या आश्वासनानंतर देण्यात येत आहेत,’ असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व एनएचएआयला दिले.

मुंबई : गेले १२ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे व दुरुस्तीचे काम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन राज्य सरकार व राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाने (एनएचएआय) बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिले. आधीच दोनदा मुदतवाढ घेतलेल्या सरकारने यावेळी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, तर त्याची गांभीर्याने दखल घेऊन न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करू, अशी तंबी यावेळी न्यायालयाने सरकार व एनएचएआयला दिली.

‘राष्ट्रीय महामार्ग - ६६ च्या (मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग) रुंदीकरणाचे व दुरुस्तीसह सर्व बाबींचे काम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करा. हे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचएआयच्या आश्वासनानंतर देण्यात येत आहेत,’ असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व एनएचएआयला दिले. राज्य सरकार आणि एनएचआयच्या हमीनंतर न्यायालयाने याचिकादार ओवेस पेचकर यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. 

व्यवसायाने वकील असलेले ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणास होत असलेल्या विलंबाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला.

-  मुंबई-गोवा महामार्ग १२ वर्षांपासून रखडलेला आहे.-  या मार्गासाठी आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.-  महामार्गाची एकूण लांबी ४६० किमी आहे -  कासू ते इंदापूर हा ४२ किमी भाग आजही अपूर्णावस्थेत आहे.-  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवाआधी पाच दौरे करून एक लेन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण झालेले नाही.

१२ वर्षे उलटली तरीही; उच्च न्यायालयाने सुनावले  २०११ मध्ये सुरू केलेला प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचे आणि या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश राज्य सरकार व एनएचआयला द्यावेत, अशी मागणी पेचकर यांनी याचिकेद्वारे केली होती. 

राज्य सरकार आणि एनएचआयने महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी याआधीही दोनदा मुदतवाढ घेतली आहे. त्यामुळे आता त्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती पेचकर यांनी न्यायालयाला केली. 

महामार्ग रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू होऊन १२ वर्षे उलटली तरीही अद्याप काम पूर्ण झालेले नाही, असे न्यायालयाने टोला लगावत म्हटले.

मुंबई-गोवा महामार्गासारख्या पायाभूत प्रकल्पांना विलंब झाल्यास केवळ लोकांनाच अडचणीचा सामना करावा लागत नाही, तर प्रकल्पाचा खर्चही वाढतो. त्याचा राज्याच्या तिजोरीवर व पर्यायाने नागरिकांच्या खिशावर ताण पडतो, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदविले. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMumbaiमुंबईgoaगोवा