शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वर्षाच्या सुरुवातीलाच ३१ डिसेंबरची मुदत..! मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 07:07 IST

‘राष्ट्रीय महामार्ग - ६६ च्या (मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग) रुंदीकरणाचे व दुरुस्तीसह सर्व बाबींचे काम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करा. हे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचएआयच्या आश्वासनानंतर देण्यात येत आहेत,’ असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व एनएचएआयला दिले.

मुंबई : गेले १२ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे व दुरुस्तीचे काम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन राज्य सरकार व राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाने (एनएचएआय) बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिले. आधीच दोनदा मुदतवाढ घेतलेल्या सरकारने यावेळी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, तर त्याची गांभीर्याने दखल घेऊन न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करू, अशी तंबी यावेळी न्यायालयाने सरकार व एनएचएआयला दिली.

‘राष्ट्रीय महामार्ग - ६६ च्या (मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग) रुंदीकरणाचे व दुरुस्तीसह सर्व बाबींचे काम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करा. हे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचएआयच्या आश्वासनानंतर देण्यात येत आहेत,’ असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व एनएचएआयला दिले. राज्य सरकार आणि एनएचआयच्या हमीनंतर न्यायालयाने याचिकादार ओवेस पेचकर यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. 

व्यवसायाने वकील असलेले ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणास होत असलेल्या विलंबाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला.

-  मुंबई-गोवा महामार्ग १२ वर्षांपासून रखडलेला आहे.-  या मार्गासाठी आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.-  महामार्गाची एकूण लांबी ४६० किमी आहे -  कासू ते इंदापूर हा ४२ किमी भाग आजही अपूर्णावस्थेत आहे.-  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवाआधी पाच दौरे करून एक लेन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण झालेले नाही.

१२ वर्षे उलटली तरीही; उच्च न्यायालयाने सुनावले  २०११ मध्ये सुरू केलेला प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचे आणि या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश राज्य सरकार व एनएचआयला द्यावेत, अशी मागणी पेचकर यांनी याचिकेद्वारे केली होती. 

राज्य सरकार आणि एनएचआयने महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी याआधीही दोनदा मुदतवाढ घेतली आहे. त्यामुळे आता त्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती पेचकर यांनी न्यायालयाला केली. 

महामार्ग रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू होऊन १२ वर्षे उलटली तरीही अद्याप काम पूर्ण झालेले नाही, असे न्यायालयाने टोला लगावत म्हटले.

मुंबई-गोवा महामार्गासारख्या पायाभूत प्रकल्पांना विलंब झाल्यास केवळ लोकांनाच अडचणीचा सामना करावा लागत नाही, तर प्रकल्पाचा खर्चही वाढतो. त्याचा राज्याच्या तिजोरीवर व पर्यायाने नागरिकांच्या खिशावर ताण पडतो, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदविले. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMumbaiमुंबईgoaगोवा