शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कर्जमाफी योजना फसवी - अजित पवार

By admin | Updated: July 7, 2017 16:55 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असून, सरकारने लादलेल्या अटी व शर्तींमध्ये शेतकरी भरडला जात आहे.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 07 - राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असून, सरकारने लादलेल्या अटी व शर्तींमध्ये शेतकरी भरडला जात आहे. त्यातच सरकारच्याच आदेशाने शेतकऱ्यांनी कर्जाचे पुर्नगठण केले. मात्र, कर्जाचे पुर्नगठण केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफीतून वगळून राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी केला.नगर येथील सहकार सभागृहात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा झाला़ त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते, म्हणाले, अनेक लोकप्रिय घोषणा देऊन सध्याचे सरकार सत्तेत आले. लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविलेल्या सरकारने लोकांना बुरे दिन आणले आहेत. भाजीपाल्याला भाव नाही, दूधाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. राष्ट्रवादी, काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर सरकारने या संघर्ष यात्रेला विरोध करण्यासाठी संवाद यात्रा काढली. मात्र, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संपाची हाक देत शहरांकडे जाणारा भाजीपाला, दूध अडविले. त्यामुळे सरकारला जाग आली आणि कर्जमाफीची घोषणा केली. ही घोषणा करताना सरकारने वारंवार अध्यादेश बदलले. रोज नवीन नियम व नवीन घोषणा सरकार करीत आहे. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याचे कर्ज माफ झालेले नाही़ ही कर्जमाफी देताना सरकारने अनेक अटी व शर्ती टाकल्या आहेत. त्यामुळे या कर्जमाफीपासून अनेक गरजू शेतकरी वंचित राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी होती, अशा शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुर्नगठणाचे आदेश सरकारने काढले होते. मात्र, आता कर्जमाफी देताना हेच शेतकरी वगळले आहेत. त्यामुळे खरे गरजू शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. नगर जिल्ह्यात पुर्नगठण झालेले ४० हजार ३१५ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत़ या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.शिवसेना ढोंगी...राज्यमंत्रिमंडळात शिवसेनेचे १२ मंत्री आहेत. हे मंत्री कॅबीनेटमध्ये सरकारच्या निर्णयाशी सहमत असतात. मात्र, शिवसेनेचे नेते बाहेर सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरतात. हा सरळसरळ ढोंगीपणा आहे. त्यांना विरोधच करायचा तर सभागृहात विरोध का केला जात नाही़ शिवसेनेने बँकांपुढे ढोल वाजवण्याचे नाटक करण्यापेक्षा मंत्रालयात, वर्षा बंगल्यावर ढोल वाजवावेत. शिवसेना सत्तेत आहे, हेच अजून त्यांना कळले नाही, असे पवार म्हणाले.मध्यावधींची शक्यता नाहीच...भाजप, शिवसेना १५ वर्षांनंतर सत्तेत आली आहे़ त्यामुळे ते सत्ता सोडणार नाहीत. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असा त्यांचा खेळ सुरु आहे. रत्यावर येऊन राज्य सरकारविरुद्ध भांडायचं आणि सभागृहात गेल्यावर त्याच सरकारला टाळी द्यायची, अशी निती शिवसेनेची आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाहीच. निवडणुका घेताना ते जनतेला कोणत्या तोंडाने सामोरे जाणार आहेत, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.केंद्राचा अनागोंदी कारभार...केंद्र सरकारने नोटा बंदी करुन किती काळे धन बाहेर काढले, किती पैसा जमा झाला, याचा ताळेबंद सादर करावा. नोटा बंदीने पिळलेल्या जनतेला आता पुन्हा जीएसटी लागू करुन छळले आहे. बेरोजगारी वाढत आहे, व्यापारी संतापले आहेत, महिलांवर अन्याय होत आहेत, मागासवर्गीय, अल्पसंख्याक लोकांचे खून पाडले जात आहेत, कामगारांचे संरक्षण करणारे कायदे कमी केले जात आहेत, असा सर्व अनागोंदी कारभार देशात सुरु आहे, अशा शब्दात पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.