शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी : केवळ ४ हजार लाभार्थी!, यादीच्या घोळात अडकली प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 06:35 IST

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अजूनही याद्यांच्या घोळातच अडकली आहे.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अजूनही याद्यांच्या घोळातच अडकली आहे. आतापर्यंत ५५ हजार शेतकºयांच्या खात्यांवर कर्जमाफीचे ३७० कोटी जमा झाले आहेत, असा दावा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केला असला, तरी मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत केवळ चार हजार ४७० शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. दिवाळीपूर्वी ज्या शेतकºयांना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते, त्यांचेही खाते अद्याप बेबाक झालेले नाही.कर्जमाफीसंदर्भात ‘लोकमत’ने जिल्हानिहाय आढावा घेतला असता मिळालेली माहिती धक्कादायक आहे. विदर्भातील एकाही शेतकºयाच्या नावे अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख ४० हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असताना, बँक अधिकारी, सहकार खात्यातील कर्मचारी आणि आयटी विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकºयांना बसला. यवतमाळ जिल्ह्याचा चुकीचा अहवाल दिला गेल्याने आलेले पैसे परत गेले! सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ऊसपट्ट्यातील शेतकरी कर्जमाफीच्या एका जाचक अटीत अडकले आहेत. प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी संबंधित शेतकºयाने २०१६-१७ या आर्थिक वर्षातील कर्जाची जुलै २०१७ पर्यंत परतफेड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण जुलैपासून जानेवारीपर्यंत पीक कर्जाची उचल केली जाते. त्यामुळे जानेवारी, फेबु्रवारीमध्ये उचल केलेल्या कर्जाची जुलैमध्ये परतफेड कशी करायची, असा प्रश्न ऊसउत्पादक शेतकºयांना पडला आहे.>अर्ज न करताही यादीत नाव!कोल्हापूर जिल्ह्यातील २१ हजार शेतकºयांची नावे पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यामध्ये ज्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेच नाही, अशा अनेक शेतकºयांचीही नावे होती. सहकार विभागाने तपासणी केल्यानंतर ही यादी आयटी विभागाने मागे घेतली.तणावाने अधिकारी अस्वस्थ : सॉफ्टवेअरमध्ये बदल करता येत नाही आणि जलदगतीने माहिती अपलोड करता येत नसल्याने याद्यांना विलंब होत आहे. त्याचा दबाव सहकार व जिल्हा बँकेच्या अधिकाºयांवर आहे. एका सहायक निबंधकाला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.>प्रमाणपत्रेमिळाली तरी...!सरकारने दिवाळीपूर्वी प्रातिनिधिक स्वरूपात१५० शेतकºयांचा जिल्हा पातळीवर तर १० शेतकºयांचा थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिली. मात्र महिना उलटून गेला तरी त्यांचा सातबारा कोरा झालेला नाही.>प्रत्यक्ष कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांची जिल्हानिहाय संख्यामराठवाड्यातील अनेकनावे चुकल्यामुळे ग्रीन लिस्टमध्ये त्यांचा समावेश होऊ शकलेला नाही, तर बोटांचे ठसे न उमटल्याने अनेकांना फटका बसला.>जोपर्यंत कर्जमाफीचीसंपूर्ण रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार नाही, तोपर्यंत नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही.- अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

टॅग्स :FarmerशेतकरीMumbaiमुंबई