शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कर्जमाफी : केवळ ४ हजार लाभार्थी!, यादीच्या घोळात अडकली प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 06:35 IST

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अजूनही याद्यांच्या घोळातच अडकली आहे.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अजूनही याद्यांच्या घोळातच अडकली आहे. आतापर्यंत ५५ हजार शेतकºयांच्या खात्यांवर कर्जमाफीचे ३७० कोटी जमा झाले आहेत, असा दावा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केला असला, तरी मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत केवळ चार हजार ४७० शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. दिवाळीपूर्वी ज्या शेतकºयांना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते, त्यांचेही खाते अद्याप बेबाक झालेले नाही.कर्जमाफीसंदर्भात ‘लोकमत’ने जिल्हानिहाय आढावा घेतला असता मिळालेली माहिती धक्कादायक आहे. विदर्भातील एकाही शेतकºयाच्या नावे अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख ४० हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असताना, बँक अधिकारी, सहकार खात्यातील कर्मचारी आणि आयटी विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकºयांना बसला. यवतमाळ जिल्ह्याचा चुकीचा अहवाल दिला गेल्याने आलेले पैसे परत गेले! सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ऊसपट्ट्यातील शेतकरी कर्जमाफीच्या एका जाचक अटीत अडकले आहेत. प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी संबंधित शेतकºयाने २०१६-१७ या आर्थिक वर्षातील कर्जाची जुलै २०१७ पर्यंत परतफेड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण जुलैपासून जानेवारीपर्यंत पीक कर्जाची उचल केली जाते. त्यामुळे जानेवारी, फेबु्रवारीमध्ये उचल केलेल्या कर्जाची जुलैमध्ये परतफेड कशी करायची, असा प्रश्न ऊसउत्पादक शेतकºयांना पडला आहे.>अर्ज न करताही यादीत नाव!कोल्हापूर जिल्ह्यातील २१ हजार शेतकºयांची नावे पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यामध्ये ज्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेच नाही, अशा अनेक शेतकºयांचीही नावे होती. सहकार विभागाने तपासणी केल्यानंतर ही यादी आयटी विभागाने मागे घेतली.तणावाने अधिकारी अस्वस्थ : सॉफ्टवेअरमध्ये बदल करता येत नाही आणि जलदगतीने माहिती अपलोड करता येत नसल्याने याद्यांना विलंब होत आहे. त्याचा दबाव सहकार व जिल्हा बँकेच्या अधिकाºयांवर आहे. एका सहायक निबंधकाला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.>प्रमाणपत्रेमिळाली तरी...!सरकारने दिवाळीपूर्वी प्रातिनिधिक स्वरूपात१५० शेतकºयांचा जिल्हा पातळीवर तर १० शेतकºयांचा थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिली. मात्र महिना उलटून गेला तरी त्यांचा सातबारा कोरा झालेला नाही.>प्रत्यक्ष कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांची जिल्हानिहाय संख्यामराठवाड्यातील अनेकनावे चुकल्यामुळे ग्रीन लिस्टमध्ये त्यांचा समावेश होऊ शकलेला नाही, तर बोटांचे ठसे न उमटल्याने अनेकांना फटका बसला.>जोपर्यंत कर्जमाफीचीसंपूर्ण रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार नाही, तोपर्यंत नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही.- अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

टॅग्स :FarmerशेतकरीMumbaiमुंबई