शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कर्जमाफीत सावळागोंधळ; एकच आधार आणि बँक अकाऊंट नंबर असलेले लाखो लाभार्थी शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 11:04 AM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे.  राज्यातील बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मुंबई- शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे.  राज्यातील बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दिवाळीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील गोंधळाची परिस्थिती आता समोर येत आहे. एकच आधार कार्ड क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले लाखो लाभार्थी या यादीत आहे. उदाहरणासाठी, दिलीप काचळे या शेतकऱ्याचा आधार क्रमांक 111111110157 आणि बँक अकाऊंट नंबर 111111111111 आहे. तर बाळकृष्ण रामघंगाळी यांचाही आधार कार्ड क्रमांक  111111110157 आणि बँक अकाऊंट नंबर 111111111111  आहे. अशा शेकडो लाभार्थ्यांचे आधार आणि बँक अकाऊंट नंबर एकच असून यामुळे राज्य सरकारसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. आम्हाला एकच आधार आणि बँक अकाऊंट नंबर असलेले लाभार्थी बघून आश्चर्याचा धक्का बसला. शेकडो लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर एकच असणं, हे आम्हाला विचारात टाकण्यासारखं आहे, असं . माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही के गौतम यांनी म्हंटलं आहे.

याशिवाय एकाच शेतकऱ्याच्या नावाने सहा कर्ज खाती आणि एका शेतकऱ्याचं नाव एकाच यादीत तीन वेळा असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती याआधीही समोर आली आहे.  उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील शेतकरी भारत तांबे यांनी 1 लाख 40 हजार रुपयांच्या कर्जमाफीसाठी अर्ज केलेला असताना त्याला फक्त 10 हजार रुपयाच्या कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. दुसरीकडे राज्य सरकारने 89 लाख शेतकऱ्यांचे 34 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात कर्जमाफीचा आकडा 20 हजार कोटी रुपयांच्या जवळपासच राहील, असा अंदाज आहे.